शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

करिअर रखडले; उत्सवात विघ्न, कोल्हापुरात ९६१ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:24 IST

क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले

उद्धव गोडसेकोल्हापूर : गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतलेल्या ९६१ जणांवर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १४९ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांचा निकाल लागला असून, ११३ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले आहे, तर अनेकांना पासपोर्ट मिळण्यात ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तरुणांचे करिअर पणाला लावायचे का? याचा मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.उत्सव उत्साहात साजरे व्हायला पाहिजेत, यात दुमत नाहीच. पण, उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. विना परवानगी मंडप उभारणे, डीजे लावून आवाजाचा दणदणाट करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर लावून वाहतुकीला अडथळा करणे, मिरवणूक मार्गात मुद्दाम थांबून इतर मंडळांची अडवणूक करणे, मारामारी करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार मंडळांकडून होतात. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागिरकांना सहन करावा लागतो.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्यात असे १४९ गुन्हे दाखल करून ९६१ जणांवर कारवाई केली. त्यापैकी १७ गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागला असून, ११३ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

तरुणांच्या करिअरला धोकागुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये बहुतांश तरुण आहेत. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्यात गुन्ह्यांची नोंद होणार आहे. यामुळे उत्सवांमध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.भाग पाच आणि सहाचे गुन्हेभाग पाच आणि सहा म्हणजे मारामारी, मिरवणुकीत गोंधळ घालणे, पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्या अंतर्गत ६७३ जणांवर कारवाई सुरू आहे.

ध्वनी प्रदूषणाचे गुन्हेगुन्हे - ४१आरोपी - २३१अदखलपात्र गुन्हेगुन्हे - १९आरोपी - ५७

उत्सव काळात नकळतपणे तरुणांकडून काही गुन्हे घडतात. काही ठिकाणी तरुण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी अशा घटनांपासून दूर राहावे. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस