शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

करिअर रखडले; उत्सवात विघ्न, कोल्हापुरात ९६१ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:24 IST

क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले

उद्धव गोडसेकोल्हापूर : गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतलेल्या ९६१ जणांवर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १४९ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांचा निकाल लागला असून, ११३ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले आहे, तर अनेकांना पासपोर्ट मिळण्यात ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तरुणांचे करिअर पणाला लावायचे का? याचा मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.उत्सव उत्साहात साजरे व्हायला पाहिजेत, यात दुमत नाहीच. पण, उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. विना परवानगी मंडप उभारणे, डीजे लावून आवाजाचा दणदणाट करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर लावून वाहतुकीला अडथळा करणे, मिरवणूक मार्गात मुद्दाम थांबून इतर मंडळांची अडवणूक करणे, मारामारी करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार मंडळांकडून होतात. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागिरकांना सहन करावा लागतो.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्यात असे १४९ गुन्हे दाखल करून ९६१ जणांवर कारवाई केली. त्यापैकी १७ गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागला असून, ११३ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

तरुणांच्या करिअरला धोकागुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये बहुतांश तरुण आहेत. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्यात गुन्ह्यांची नोंद होणार आहे. यामुळे उत्सवांमध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.भाग पाच आणि सहाचे गुन्हेभाग पाच आणि सहा म्हणजे मारामारी, मिरवणुकीत गोंधळ घालणे, पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्या अंतर्गत ६७३ जणांवर कारवाई सुरू आहे.

ध्वनी प्रदूषणाचे गुन्हेगुन्हे - ४१आरोपी - २३१अदखलपात्र गुन्हेगुन्हे - १९आरोपी - ५७

उत्सव काळात नकळतपणे तरुणांकडून काही गुन्हे घडतात. काही ठिकाणी तरुण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी अशा घटनांपासून दूर राहावे. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस