शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

करिअर रखडले; उत्सवात विघ्न, कोल्हापुरात ९६१ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:24 IST

क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले

उद्धव गोडसेकोल्हापूर : गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतलेल्या ९६१ जणांवर पोलिसांनी गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १४९ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांचा निकाल लागला असून, ११३ खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. क्षणिक आनंदाच्या अट्टहासामुळे गुन्हे दाखल झालेल्या अनेक तरुणांचे करिअर रखडले आहे, तर अनेकांना पासपोर्ट मिळण्यात ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तरुणांचे करिअर पणाला लावायचे का? याचा मंडळांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.उत्सव उत्साहात साजरे व्हायला पाहिजेत, यात दुमत नाहीच. पण, उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. विना परवानगी मंडप उभारणे, डीजे लावून आवाजाचा दणदणाट करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर लावून वाहतुकीला अडथळा करणे, मिरवणूक मार्गात मुद्दाम थांबून इतर मंडळांची अडवणूक करणे, मारामारी करणे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार मंडळांकडून होतात. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागिरकांना सहन करावा लागतो.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्यात असे १४९ गुन्हे दाखल करून ९६१ जणांवर कारवाई केली. त्यापैकी १७ गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागला असून, ११३ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

तरुणांच्या करिअरला धोकागुन्हे दाखल झालेल्या संशयितांमध्ये बहुतांश तरुण आहेत. पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या चारित्र्य पडताळणी दाखल्यात गुन्ह्यांची नोंद होणार आहे. यामुळे उत्सवांमध्ये अतिउत्साह दाखवणाऱ्या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. गुन्हे दाखल झालेल्या तरुणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.भाग पाच आणि सहाचे गुन्हेभाग पाच आणि सहा म्हणजे मारामारी, मिरवणुकीत गोंधळ घालणे, पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्या अंतर्गत ६७३ जणांवर कारवाई सुरू आहे.

ध्वनी प्रदूषणाचे गुन्हेगुन्हे - ४१आरोपी - २३१अदखलपात्र गुन्हेगुन्हे - १९आरोपी - ५७

उत्सव काळात नकळतपणे तरुणांकडून काही गुन्हे घडतात. काही ठिकाणी तरुण जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करून कारवाई ओढवून घेतात. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी अशा घटनांपासून दूर राहावे. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस