शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

पाणी आटल्याने पंचगंगा काठावरील प्राचीन मंदिरांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 15:13 IST

कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाणी आटल्याने पंचगंगा काठावरील प्राचीन मंदिरांचे दर्शनदीडशे वर्षापासून साठलेला गाळ काढल्यास नदीचा मूळ मार्गाने प्रवाहित होणार

कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.पंचगंगा नदीचा मार्ग अग्नेय दिशेला सरकल्यामुळे पूर्वी नदीच्या काठावर असणारी विविध प्राचीन मंदिरे पाण्यात गेली आहेत. शिवाजी पूल जेव्हा बांधण्यात आला, तेव्हाचा आराखडा उपलब्ध आहे. त्यावेळी जो मार्ग होता, त्या मार्गाने नदी पूर्ववत वाहू लागली तर आता पाण्यात असलेल्या मंदिरांना धोका पोहोचणार नाही.गेल्या अनेक वर्षात या नदीचा मार्ग बदलत गेला आहे. पाण्याच्या चक्राकार प्रवाहामुळे नदीसोबतचा माती आणि अन्य वस्तूंचा गाळ वायव्य दिशेला साठत गेला आहे. तो भराव हळूहळू इतका मोठा झाला की, नदी त्याला वळसा घालून पुढे जाउ लागली. त्यामुळे पूर्वी काठावर असणारी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.तत्कालीन कागदपत्रे, जुनी छायाचित्रे, चित्रकार आबालाल रेहमान आणि इतरांनी काढलेल्या चित्रांमध्ये या नदीचा मूळ प्रवाह आणि काठावरील मंदिरे दिसून येतात. पूल बांधल्यानंतर झालेला बंधारा आणि काठावरील मंदिरांना पूर्वी धोका नव्हता, मात्र हळू हळू गाळामुळे ही मंदिरे पाण्यात गेली असे मत उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.सुस्थितीत असलेल्या यातील काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. परंतु तत्पूर्वी नदीपात्रात साठलेला गाळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. अन्यथा या मंदिरांची दुरुस्ती केली तरी ही मंदिरे पुन्हा पाण्यातच राहून नष्ट होतील, असे मत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.३0 ते ३५ प्राचीन मंदिरांचे दर्शनपंचगंगा नदीच्या काठावर अंदाजे ३0 ते ३५ प्राचीन मंदिरे बांधली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मयुरेश्वर (कार्तिक स्वामी), ब्रम्हदेव, दशाश्वमेधेश्वर यासारखी दुर्मिळ मंदिरे आहेत. याशिवाय अनेकांची समाधीस्थळे, छत्रपतींच्या देवांची मंदिरे या परिसरात आहेत. पाण्याखाली गेल्यामुळे मयुरेश्वर मंदिराची झीज होत आता केवळ चबुतरा शिल्लक आहे.

पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा, शिलालेख

यासह अनेक अज्ञात मंदिरे, त्यांचे पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा तसेच काही शिलालेखही पहायला मिळतात. यातील अनेक मंदिरे ढासळली आहेत. घाटावरच्या मागील बाजूस असलेली काही मंदिरेही ढासळलेली आहेत. याचा अभ्यास केल्यास नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीTempleमंदिरkolhapurकोल्हापूर