शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Kolhapur News: 'कुंभी'तील विजयाने नरके गटाला विधानसभेसाठी बळ, आगामी निवडणुकीत गणिते बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 16:03 IST

विधानसभेतील पराभवानंतर चंद्रदीप नरके यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते

राजाराम लोंढे कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पॅनलच्या बांधणीपासून अगदी शिस्तबद्ध राबविलेली प्रचार यंत्रणा आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना एकाकी पाडण्याचा विरोधकांनी केेलेला प्रयत्न व त्यातून निर्माण झालेली सहानुभूती या सगळ्यांमुळे विजयी चौकार खेचण्यात यश आले. या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नरके यांचा आत्मविश्वास दुणावणार हे निश्चित आहे.

सत्तांतर करायचेच, या इराद्याने रिंगणात उतरलेल्या ‘शाहू’ आघाडीने चिवट झुंज दिली, मात्र अंतर्गत उट्टे काढण्याचे राजकारण व सगळे एकत्र येऊन कारखाना चालवू शकतो, हा सभासदांना विश्वास देण्यात कमी पडल्याचा त्यांना फटका बसला.विधानसभेतील पराभवानंतर चंद्रदीप नरके यांचे राजकीय खच्चीकरण झाले होते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दोन संचालक निवडून आणत त्यांनी पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘करवीर’च्या राजकारणात ‘कुंभी’ची सत्ता महत्त्वाची ठरत असल्याने नरके यांनी दोन वर्षे जोडण्या लावल्या होत्या. नरके यांच्याकडून कारखाना काढून घेण्याचा चंग बांधून गेल्या पाच- सहा वर्षांत विरोधकांनी कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत कारखान्याची निवडणूक सोपी नाही, असा सत्तारूढ गटाला इशारा दिला होता.

सुरुवातीच्या टप्प्यात विरोधकांमध्ये दोन-तीन गट असले तरी त्यांनी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली एकाच जाजमावर आणून तगडे पॅनल रिंगणात उतरवले. आता नाहीतर कधीच नाही, हे ओळखून खाडे यांनी कमालीच्या जोडण्या लावल्या होत्या. या पॅनलमधील ‘मोहरे’ हे भविष्यातील राजकारणात अडसर ठरणार, म्हणून त्यांना आताच रोखायला हवे, यासाठी एक यंत्रणा सक्रिय झाली आणि त्याचा फटका ‘शाहू’ आघाडीला बसला.सतेज यांच्या पाठिंब्यामुळे नरकेंना बळ‘कुंभी’च्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना एकाकी पाडत त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांची होती. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने नरकेंचा हुरूप वाढवलाच, त्याचबरोबर करवीरमधील विरोधकांचे मताधिक्य कमी करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.पन्हाळकरांनी चूक सुधारलीविधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्याची सल नरके यांना कायम बोचत होती. त्यादृष्टीने त्यांनी गेली दोन वर्षे बांधणी सुरू केली होती. तेथील मताधिक्य पाहता पन्हाळकरांनी चूक सुधारल्याची चर्चा सुरू आहे.अजित यांची ‘चाणक्यनीती’अजित नरके हे या निवडणुकीतील पडद्यामागचे सूत्रधार होते. अरुण नरके हे साथ देणार नाहीत, हे गृहित धरून त्यांनी पन्हाळा व गगनबावड्यात जोडण्या लावल्या. त्यांची चाणक्यनीती पुन्हा एकदा पथ्यावर पडली.

नरके पॅनलच्या विजयाची कारणे :

  • शेतकऱ्यांचा एक रुपयाही थकीत नाही
  • सतेज पाटील यांचे पाठबळ
  • अरुण नरके यांच्या भूमिकेनंतर विशेषत: पन्हाळ्यात फिरलेले वारे
  • नरके घराण्याबाबत सभासदांमध्ये असलेली आत्मियता

‘शाहू’ पॅनलच्या पराभवाची कारणे :

  • सांगरुळ व कुडित्रे गटात न मिळालेले अपेक्षित मताधिक्य
  • पन्हाळ्यातील हवा मतपेटीपर्यंत पोहोचलीच नाही.
  • कारखाना चालवू शकतात, हा विश्वास सभासदांना देण्यात कमी पडले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना