शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बॅडमिंटन खेळून घराजवळ आला, पण 'वरुण'वर काळाने घातला घाला; मद्यपी चालकाच्या बेदरकारीने हाकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:52 IST

अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले

कोल्हापूर : इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारा वरुण रवी कोरडे (वय २२, रा. उदयसिंहनगरी, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) हा वर्गात हुशार. शिक्षकांचा आवडता आणि मित्रांचा जीवलग दोस्त. बॅडमिंटनचा खेळाडू असलेला वरुण त्याच्या उदयसिंहनगरीत प्रेमळ स्वभावाने सर्वांचा लाडका होता. बुधवारी रात्री बॅडमिंटनचा सराव करून घराकडे परतताना महावीर कॉलेजसमोर भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली आणि अवघ्या १०० मीटरवर असलेल्या त्याच्या घरी तो पोहोचू शकला नाही. या अपघाताने उदयसिंहनगरी गहिवरली.नावीन्याचा ध्यास, सळसळता उत्साह, खेळाची आवड आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला वरुण त्याच्या आई-वडिलांसाठी श्रावणबाळासारखा होता. आई शिक्षिका, वडील नोकरदार, तर मोठी बहीणही उच्चशिक्षित. घरातील उच्चशिक्षणाची परंपरा वरुण पुढे चालवत होता. शिक्षणातील हुशारीसोबतच खेळाची आवड असल्याने तो नियमित बॅडमिंटन खेळत होता. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे तो रॅकेट घेऊन मोपेडवरून घरातून बाहेर पडला. ताराबाई पार्कात बॅडमिंटनचा सराव संपवून तो घराकडे निघाला.सारे काही नेहमीप्रमाणे होते. रस्त्यात मध्येच अपघाताच्या रूपाने काळ आडवा येणार असल्याची कल्पनाही त्याला नसावी. तो काळ आला आणि वेळही आली. बावड्याकडून शहरात निघालेल्या भरधाव कारने वरुणची दुचाकी उडवली. त्याला फरफटत नेले आणि अवघ्या काही सेकंदांत तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. दुर्दैव म्हणजे अपघाताच्या ठिकाणापासून त्याचे घर अवघे १०० मीटरवर आहे.नेहमीच्या वेळेत मुलगा घरी परतला नसल्याने त्याची आई अस्वस्थ होती. तेवढ्यात शेजारचे काही तरुण घरात पोहोचले. वरुणचा अपघात झाल्याचे ऐकताच कोरडे दाम्पत्याचे हातपाय गळाले. घाबरलेल्या नजरेने दोघे सीपीआरमध्ये पोहोचले. मुलगा जखमी असेल तर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती; पण तो कुठेच दिसत नाही..पोलिस काही सांगत नाहीत..त्याच्या मित्रांना शब्द फुटत नाहीत. तुमचा मुलगा आता या जगात राहिला नाही, असे सांगण्याचे धाडस कोणातच नव्हते. अखेर त्याच्या काही मित्रांनी मनाचा निश्चय करून वरुणच्या मामांना तो दगावल्याची माहिती दिली आणि बराच वेळ धीर एकवटून थांबलेले वरुणचे आई-वडील कोसळले.

तरुणांचा पुढाकारअपघात घडल्यानंतर वरुणची ओळख पटवण्यापासून ते त्याच्या आई-वडिलांना धीर देण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी महावीर कॉलेज परिसरातील तरुणांनी पार पाडली. मित्र गेल्याचे दु:ख लपवून वरुणच्या आई-वडिलांना सावरणाऱ्या तरुणांनी त्यांच्या परिपक्वतेचा परिचय दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू