शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

वारणा पाणीपुरवठा योजना आरोप-प्रत्यारोपांच्या गर्तेत-इचलकरंजीत पाणीप्रश्न चिघळतोय नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:14 IST

राजकारण, समज-गैरसमज, विरोध, व्यक्तिद्वेष, मीपणा, आरोप-प्रत्यारोप अशा गर्तेत वारणा नळ पाणीपुरवठा योजना गुरफटली आहे. पाणी मिळणार, नाही मिळणार; पाणी देणार, नाही देणार, अशा भावनेतून

अतुल आंबी ।इचलकरंजी : राजकारण, समज-गैरसमज, विरोध, व्यक्तिद्वेष, मीपणा, आरोप-प्रत्यारोप अशा गर्तेत वारणा नळ पाणीपुरवठा योजना गुरफटली आहे. पाणी मिळणार, नाही मिळणार; पाणी देणार, नाही देणार, अशा भावनेतून पेटलेला हा पाणीप्रश्न मिटण्याऐवजी चिघळत चालला आहे. याला जबाबदार कोणीही असले तरी त्याचा त्रास मात्र सर्वांनाच होत आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी आणखीन काय-काय होणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून दानोळी (ता. शिरोळ) येथून उद्भव धरून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी ६८.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आॅनलाईन पद्धतीने योजनेचे उद्घाटन झाले. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि प्रत्यक्षात योजना कार्यान्वित होण्यास अडथळे निर्माण झाले. दानोळीकरांनी पाणी न देण्याची भूमिका घेत योजनेच्या पायाभरणीला तीव्र विरोध केला. विरोधाला विरोध वाढून ग्रामस्थांवर गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर हा प्रश्न चिघळून त्याला वेगळे वळण लागले.

योजनेत राजकारण घुसल्याचे दिसू लागले. त्यामुळे इचलकरंजीकरांतून शिरोळ तालुक्यातील नेत्यांवर आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांकडून इचलकरंजीच्या नेत्यांवर आगपाखड सुरू झाली. त्यामुळे वारणा पाणीप्रश्न पेटला. हा वाद स्थानिक पातळीवर मिटत नसल्याचे पाहून याबाबत चर्चेतून तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक झाली. मे २०१८ ला झालेल्या बैठकीमध्ये इचलकरंजीकरांनी एक पाऊल मागे घेऊन दानोळीचा हट्ट सोडावा व वारणाकाठच्या ग्रामस्थांनी पाणीच देणार नाही, ही भूमिका बदलावी, असा तोडगा काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या चर्चेत दानोळीऐवजी कोथळीतून योजना राबवावी. त्यासाठी वाढीव निधी शासनाने मंजूर करावा. त्याला वारणाकाठच्या ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी मदत करावी, असे ठरविण्यात आले.

बैठकीतील निर्णयाप्रमाणे योजनेसाठी कोथळीतून सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले. मात्र, पुन्हा त्यालाही विरोध सुरू झाला. परिणामी, पुन्हा योजनेचे काम रखडले. त्यामुळे इचलकरंजीकर पुन्हा पहिल्या टप्प्यावर मागे येत दानोळीतूनच पाणी उचलण्याच्या भूमिकेवर परतले आहेत. तशा बैठका सुरू झाल्याने दानोळीकरांनीही पुन्हा विरोधासाठी तयारी सुरू केली आहे. दोन्हीकडून सुरू झालेले प्रकार पाहता हा प्रश्न मिटण्याऐवजी चिघळत आहे.परस्परविरोधी भूमिकाइचलकरंजीला पाणी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, शासन स्तरावरूनच योजना राबविणार असल्याची भूमिका इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधी व नगरपालिका यांनी घेतली आहे.वारणा नदीतून एक थेंबही पाणी इचलकरंजीला देणार नाही. त्यासाठी कोणत्याही टोकाचा संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका वारणा बचाव कृती समितीने घेतली आहे.सामाजिक भावना, संयमाच्या भूमिकेची गरजराजकारण, समज-गैरसमज, आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून सामाजिक बांधीलकीची भावना जपत सर्वच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी संयमाची भूमिका घेऊन या प्रश्नावर सामंजस्य तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.वाद-विवादातून कोणाचाच फायदा होणार नसून, नुकसान मात्र सर्वांचे होणार आहे. या प्रश्नाकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहण्याचीही आवश्यकता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूर