शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:30 IST

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, ...

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक मार्गी लागेल असे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबईचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी मंगळवारी कोल्हापुरात दिली. या भेटीनंतर त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन करवीर निवासिनीचे दर्शन घेतले.रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक पदभार स्वीकारल्यानंतर मीना यांनी प्रथमच कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट दिली. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणाही होती. अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष तासभर पाहणी करत अनेक सूचना दिल्या. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची हेरिटेज वास्तूला धक्का लागणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.मार्चअखेर पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, तसेच मुंबईतील चारही फ्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल, त्यानंतर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस आणि पुण्यापर्यंत धावणारी विशेष रेल्वे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल, अशी माहिती मीना यांनी दिली.या दौऱ्यात त्यांच्यासोबत पीसीओ शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे एसडीओएम डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, मुख्य बांधकाम व्यवस्थापक, विद्युत अभियंता, विभागीय अभियंता, स्टेशन व्यवस्थापक विजय कुमार उपस्थित होते. यावेळी सांगली, कोल्हापूर रेल्वे प्रवासी संस्थेतर्फे रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयंत ओसवाल यांनी मीना यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा मीना यांना भेट दिली.

रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडतीमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना टर्मिनसच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजता आले. त्यांनी रनिंग रूम, लिनन कक्ष, पार्सल कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य तिकीट आरक्षण, स्थानक इमारत व तिकीट विक्रीच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांनी सुमारे एकवीस मिनिटे छत्रपती शाहू टर्मिनसची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रवाशांची गर्दी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तिकीट मशीन जादा का लावलेली नाहीत, असा प्रश्न केला. तेथे सीसीटीव्ही नसल्याचेही त्यांनी लक्षात घेऊन सीसीटीव्ही त्वरित बसविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

रुकडी, जयसिंगपुरात लूप लाईनकोल्हापूर-मिरज दुहेरीकरण काम या वर्षअखेरीपर्यंत पूर्ण होईल. या मार्गाच्या फायनल लोकेशनचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव असल्याचेही मीना यांनी सांगितले. याच मार्गावर रुकडी आणि जयसिंगपूर स्थानक येथे लूप लाईनला मंजुरी मिळाली असून, त्याचे काम पूर्ण होताच क्रॉसिंगचा वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील बंद गाड्या पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वळीवडे (गांधीनगर) स्थानकावर काही गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबई