शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:30 IST

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, ...

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक मार्गी लागेल असे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबईचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी मंगळवारी कोल्हापुरात दिली. या भेटीनंतर त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन करवीर निवासिनीचे दर्शन घेतले.रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक पदभार स्वीकारल्यानंतर मीना यांनी प्रथमच कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट दिली. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणाही होती. अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष तासभर पाहणी करत अनेक सूचना दिल्या. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची हेरिटेज वास्तूला धक्का लागणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.मार्चअखेर पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, तसेच मुंबईतील चारही फ्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल, त्यानंतर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस आणि पुण्यापर्यंत धावणारी विशेष रेल्वे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल, अशी माहिती मीना यांनी दिली.या दौऱ्यात त्यांच्यासोबत पीसीओ शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे एसडीओएम डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, मुख्य बांधकाम व्यवस्थापक, विद्युत अभियंता, विभागीय अभियंता, स्टेशन व्यवस्थापक विजय कुमार उपस्थित होते. यावेळी सांगली, कोल्हापूर रेल्वे प्रवासी संस्थेतर्फे रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयंत ओसवाल यांनी मीना यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा मीना यांना भेट दिली.

रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडतीमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना टर्मिनसच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजता आले. त्यांनी रनिंग रूम, लिनन कक्ष, पार्सल कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य तिकीट आरक्षण, स्थानक इमारत व तिकीट विक्रीच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांनी सुमारे एकवीस मिनिटे छत्रपती शाहू टर्मिनसची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रवाशांची गर्दी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तिकीट मशीन जादा का लावलेली नाहीत, असा प्रश्न केला. तेथे सीसीटीव्ही नसल्याचेही त्यांनी लक्षात घेऊन सीसीटीव्ही त्वरित बसविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

रुकडी, जयसिंगपुरात लूप लाईनकोल्हापूर-मिरज दुहेरीकरण काम या वर्षअखेरीपर्यंत पूर्ण होईल. या मार्गाच्या फायनल लोकेशनचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव असल्याचेही मीना यांनी सांगितले. याच मार्गावर रुकडी आणि जयसिंगपूर स्थानक येथे लूप लाईनला मंजुरी मिळाली असून, त्याचे काम पूर्ण होताच क्रॉसिंगचा वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील बंद गाड्या पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वळीवडे (गांधीनगर) स्थानकावर काही गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबई