शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:30 IST

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, ...

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक मार्गी लागेल असे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबईचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी मंगळवारी कोल्हापुरात दिली. या भेटीनंतर त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन करवीर निवासिनीचे दर्शन घेतले.रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक पदभार स्वीकारल्यानंतर मीना यांनी प्रथमच कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट दिली. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणाही होती. अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष तासभर पाहणी करत अनेक सूचना दिल्या. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची हेरिटेज वास्तूला धक्का लागणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.मार्चअखेर पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, तसेच मुंबईतील चारही फ्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल, त्यानंतर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस आणि पुण्यापर्यंत धावणारी विशेष रेल्वे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल, अशी माहिती मीना यांनी दिली.या दौऱ्यात त्यांच्यासोबत पीसीओ शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे एसडीओएम डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, मुख्य बांधकाम व्यवस्थापक, विद्युत अभियंता, विभागीय अभियंता, स्टेशन व्यवस्थापक विजय कुमार उपस्थित होते. यावेळी सांगली, कोल्हापूर रेल्वे प्रवासी संस्थेतर्फे रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयंत ओसवाल यांनी मीना यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा मीना यांना भेट दिली.

रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडतीमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना टर्मिनसच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजता आले. त्यांनी रनिंग रूम, लिनन कक्ष, पार्सल कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य तिकीट आरक्षण, स्थानक इमारत व तिकीट विक्रीच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांनी सुमारे एकवीस मिनिटे छत्रपती शाहू टर्मिनसची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रवाशांची गर्दी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तिकीट मशीन जादा का लावलेली नाहीत, असा प्रश्न केला. तेथे सीसीटीव्ही नसल्याचेही त्यांनी लक्षात घेऊन सीसीटीव्ही त्वरित बसविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

रुकडी, जयसिंगपुरात लूप लाईनकोल्हापूर-मिरज दुहेरीकरण काम या वर्षअखेरीपर्यंत पूर्ण होईल. या मार्गाच्या फायनल लोकेशनचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव असल्याचेही मीना यांनी सांगितले. याच मार्गावर रुकडी आणि जयसिंगपूर स्थानक येथे लूप लाईनला मंजुरी मिळाली असून, त्याचे काम पूर्ण होताच क्रॉसिंगचा वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील बंद गाड्या पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वळीवडे (गांधीनगर) स्थानकावर काही गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबई