शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या ‘राज’ यांच्यासोबत ‘उद्धव’ यांनी जाऊ नये - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:39 IST

जनसुरक्षा कायदा महत्वाचाच..

कोल्हापूर : उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. पण, बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारे ‘राज’ यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी जाऊ नये, असे माझे मत असल्याची माहिती ‘रिपाई’नेते व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. कोल्हापुरात १६ नोव्हेंबरला बौद्ध धर्म परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रामदास आठवले हे मंगळवारी अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. आठवले म्हणाले, मुंबईत ६० टक्के अमराठी तर ४० टक्के मराठी मतदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक भाषिकांना सोबत घेऊन काम केले. मराठी प्रत्येकाने शिकली पाहिजे, म्हणून कोणी दादागिरी करू नये.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाणार असून यामध्ये ‘रिपाई’ही सहभागी राहणार आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगोदरपासून आम्ही महायुतीमध्ये असताना आम्हाला राज्यात मंत्रीपद, महामंडळ दिलेले नाही. त्यामुळे समाज नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.जनसुरक्षा कायदा महत्वाचाच..नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणणं महत्त्वाचं होते. हा कायदा संविधान विरोधी नसून या कायद्यानंतर अन्याय होत असेल तर त्यामध्ये बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे आठवले यांनी सांगितले.गायकवाड यांच्यावरील हल्ला चुकीचाचप्रवीण गायकवाड आमचे चांगले मित्र आहेत. शाहू, फुले, आंबेडकरवादी विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक वेळा आपले विचार मांडले आहेत. त्यांच्यावर शाईफेक हल्ला चुकीचाच असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले.