शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पोटदुखी, उलट्यांचे कारण; दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू, कोल्हापुरातील संभापूर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:00 IST

जन्मजातच हृदय कमकुवत

शिरोली : संभापूर (ता. हातकणंगले) येथे पोटदुखी आणि उलट्या झाल्या, तसेच कार्डिओमायोपाथी हा आजार निष्पन्न होऊन हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोन लहान सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. विराज सागर पोवार (वय ४) आणि वरद सागर पोवार (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आणि शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण संभापूर हळहळत आहे.अधिक माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे शेतकरी सागर पोवार हे कुटुंबासह राहतात. आठ दिवसांपूर्वी विराज आणि वरद हे सख्खे भाऊ सांगरूळ (ता. करवीर) येथे मामाच्या गावी सुट्टीला गेले होते. घरातील कामे आटपून आई पूजासुद्धा माहेरी गेल्या होत्या. सोमवारी (दि.१९) हे सर्वजण मामाच्या गावावरून परत आले. मंगळवारी वरद आणि विराज यांच्या पोटात दुखायला लागले, म्हणून त्यांना पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. गुरुवारी पुन्हा पोटात दुखू लागल्याने दोघांनाही पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता, तेथे विराजला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच अवघ्या एका तासात विराजचा मृत्यू झाला. वरदला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जा, असे डॉक्टरांनी सांगितले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री वरदला उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. पण, शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला. विराजचा अहवाल उत्तरीय तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या रक्ताचे नमुने, अवयव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत.दोघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की, अनुवंशिक रोगामुळे झाला, हे पंधरा दिवसांनंतर अहवालानंतर आल्यावरच समजणार आहे.दप्तर, वह्यांचीही खरेदीमंगळवारी वरद आणि विराज यांना पेठवडगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन दोन्ही मुलांना शाळेचे दप्तर, वह्या, पिशव्या आई-वडिलांनी खरेदी केल्या होत्या. वरद आणि विराज यांना सर्दी, खोकला, ताप, कणकणी असं कोणताही आजार झाला नाही. फक्त पोटात दुखून उलट्या झाल्या आणि हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे.हृदय १२ टक्केच कार्यरतवरदला कोल्हापूर येथील मसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेव्हा त्याचे हृदय १२ ते १५ टक्के काम करत होते. सर्वसामान्य माणसाचे हृदय हे ६० ते ६५ टक्के काम करते, तसेच वरद पोवारचा इको केल्यावर कार्डीओमायापाथी निष्पन्न झाला आहे, असे डॉ. उदय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू