शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:01 IST

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : शहर परिसरात गेली दोन दिवस उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसतच आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या धारा सुरुच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरीधरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने काल, बुधवार पासून धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काल राधानगरीचे चार दरवाजे उघडले होते यातील दोन दरवाजे बंद झाले. मात्र, पुन्हा आज दोन दरवाजे खुले झाले. काही वेळातच पाचवा दरवाजाही खुला झाल्याने धरणातून 8740 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. परिणामी पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सायंकाळी पंचगंगेची पातळी ४१ फूट ८ इंच इतकी झाली असून धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्याआधीच काल, बुधवार पासून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सध्या पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद  वादळी पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील केर्ली जवळील यश हॅाटेल शेजारी वादळी वडाचे झाड रात्री उन्मळून पडले. या मार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रशासनाने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोडी झाली नाही.उघडीप असली तरी पातळी स्थिर राहणारराधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले तर ते पाणी पंचगंगेपर्यंत येण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगेची पातळी स्थिर राहणार आहे.

चिखली, आंबेवाडीतील 500 कुटुंबे स्थलांतरित

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावात अद्याप पुराचे पाणी आले नसले तरी दक्षता बाळगत जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांतील जवळपास 500 कुटुंबे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केली आहेत.

कोल्हापूर-केर्ली मार्गावर पाणी

कोल्हापूर ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर दीड फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाइचलकरंजी ते कुरुंदवाडगडहिंग्लज ते ऐनापूरमलकापूर ते शित्तूरचंदगड ते दोडामार्गगगनबावडा ते करुळ घाटआजरा ते देव कांडगाव

काल, बुधवारी राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे असे उघडत गेलेपहाटे 5.30 वाजता - गेट क्रमांक 6सकाळी 8.55 वाजता - गेट क्रमांक 5दुपारी 2.20 वाजता - गेट क्रमांक 3दुपारी 3.20 वाजता - गेट क्रमांक 4

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणKolhapur Floodकोल्हापूर पूरradhanagari-acराधानगरी