शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी ८४ लाखांचा निधी परत जाणार! --: हुपरी नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:26 IST

मुदतवाढ देऊनही नगर परिषदेचे कारभारी शहरात नागरी विकासकामे उभारण्यास असमर्थ ठरल्याचे वास्तव आता समोर आले आहे.

ठळक मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा परिपाक, नागरिकांमध्ये संताप

तानाजी घोरपडे।हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाने दिलेला तीन कोटी ५0 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे दायित्व येथील नगर परिषद पेलू शकलेली नाही.शासनाने घालून दिलेल्या मुदतीनंतरही तब्बल सहा महिने परत मुदतवाढ देऊनही नगर परिषदेचे कारभारी शहरात नागरी विकासकामे उभारण्यास असमर्थ ठरल्याचे वास्तव आता समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून प्रारंभाचे नारळ फोडून सुरू करण्यात आलेली विकासकामेही सध्या अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आली आहेत. परिणामी, सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा परिपाक म्हणून सुमारे दोन कोटी ८४ लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नव्याने नगर परिषद स्थापन झालेल्या शहरांमध्ये पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून राज्यशासनाने मागील वर्षी हुपरी नगर परिषदेला खास बाब म्हणून सुमारे तीन कोटी ५0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरात आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्ते, गटारी, आदी विकासकामांची उभारणी करावयाची होती. हा निधी ३१ मार्चअखेर खर्च करण्याची मुदत होती. मात्र, नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाºयांच्या कार्यपद्धतीमुळे हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाने हा निधी खर्च करण्यासाठी राज्यशासनाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार शासनानेही मोठ्या मनाने ३0 सप्टेंबरपर्यंत म्हणजे तब्बल सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात नागरी विकासकामे उभारण्यासाठी नियमांप्रमाणे सर्व सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. प्रशासनाने या कामाच्या निविदा विलंबाने का होईना मागवून घेतल्या. मात्र, यामध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याने त्या उघडण्यासाठी सप्टेंबर महिना निम्मा संपला. उरलेल्या १५ दिवसांत हा निधी खर्च होणे अशक्य होऊन गेल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रारंभाचे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ही कामे अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आली आहेत. शहराच्या विकासासाठी राज्यशासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी देऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही सत्ताधा-यांना शहरात नागरी विकासकामे उभारता आलेली नाहीत.चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई कराभाजपच्या नगरसेविका ऋतुजा अभिनव गोंधळी म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला निधी सत्ताधाºयांच्या निष्क्रिय व अकार्यक्षमतेमुळे परत जाणार असेल, तर याला जबाबदार कोण? या निधीबाबतची माहिती मिळावी. यासाठी एक महिन्यापूर्वी माहिती अधिकारात मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने माहिती दिलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण करणार आहोत.

याबाबत मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार व नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, सन २0१७-१८ मध्ये हा निधी प्राप्त झाला होता. आचारसंहिता व महापूर कालावधीत प्रशासनातील बहुतांश अधिकारी व्यस्त राहिल्यामुळे हा निधी निर्धारित वेळेत खर्च करता आला नाही. या निधीतून शहरात नागरी विकासकामे उभारण्यासाठी परत मुदतवाढ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार करू.सत्ताधा-यांना निधी खर्च न करता येणे दुर्दैवमनसेचे नगरसेवक व गट नेते दौलतराव पाटील म्हणाले, रौप्यनगरीच्या विकासासाठी राज्यशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सत्ताधारी भाजपचे अकार्यक्षम कारभारी हा निधी खर्च करून शहराचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेत. शहराच्या विकासासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सत्ताधाºयांना जर शहराचा विकास करता येत नसेल, तर हे शहरवासियांचे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाfundsनिधी