शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

दोन कोटी ८४ लाखांचा निधी परत जाणार! --: हुपरी नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:26 IST

मुदतवाढ देऊनही नगर परिषदेचे कारभारी शहरात नागरी विकासकामे उभारण्यास असमर्थ ठरल्याचे वास्तव आता समोर आले आहे.

ठळक मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा परिपाक, नागरिकांमध्ये संताप

तानाजी घोरपडे।हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाने दिलेला तीन कोटी ५0 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे दायित्व येथील नगर परिषद पेलू शकलेली नाही.शासनाने घालून दिलेल्या मुदतीनंतरही तब्बल सहा महिने परत मुदतवाढ देऊनही नगर परिषदेचे कारभारी शहरात नागरी विकासकामे उभारण्यास असमर्थ ठरल्याचे वास्तव आता समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून प्रारंभाचे नारळ फोडून सुरू करण्यात आलेली विकासकामेही सध्या अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आली आहेत. परिणामी, सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा परिपाक म्हणून सुमारे दोन कोटी ८४ लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नव्याने नगर परिषद स्थापन झालेल्या शहरांमध्ये पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून राज्यशासनाने मागील वर्षी हुपरी नगर परिषदेला खास बाब म्हणून सुमारे तीन कोटी ५0 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरात आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्ते, गटारी, आदी विकासकामांची उभारणी करावयाची होती. हा निधी ३१ मार्चअखेर खर्च करण्याची मुदत होती. मात्र, नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाºयांच्या कार्यपद्धतीमुळे हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाने हा निधी खर्च करण्यासाठी राज्यशासनाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार शासनानेही मोठ्या मनाने ३0 सप्टेंबरपर्यंत म्हणजे तब्बल सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात नागरी विकासकामे उभारण्यासाठी नियमांप्रमाणे सर्व सोपस्कार पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. प्रशासनाने या कामाच्या निविदा विलंबाने का होईना मागवून घेतल्या. मात्र, यामध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याने त्या उघडण्यासाठी सप्टेंबर महिना निम्मा संपला. उरलेल्या १५ दिवसांत हा निधी खर्च होणे अशक्य होऊन गेल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रारंभाचे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ही कामे अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आली आहेत. शहराच्या विकासासाठी राज्यशासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी देऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही सत्ताधा-यांना शहरात नागरी विकासकामे उभारता आलेली नाहीत.चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई कराभाजपच्या नगरसेविका ऋतुजा अभिनव गोंधळी म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेला निधी सत्ताधाºयांच्या निष्क्रिय व अकार्यक्षमतेमुळे परत जाणार असेल, तर याला जबाबदार कोण? या निधीबाबतची माहिती मिळावी. यासाठी एक महिन्यापूर्वी माहिती अधिकारात मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने माहिती दिलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण करणार आहोत.

याबाबत मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार व नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, सन २0१७-१८ मध्ये हा निधी प्राप्त झाला होता. आचारसंहिता व महापूर कालावधीत प्रशासनातील बहुतांश अधिकारी व्यस्त राहिल्यामुळे हा निधी निर्धारित वेळेत खर्च करता आला नाही. या निधीतून शहरात नागरी विकासकामे उभारण्यासाठी परत मुदतवाढ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार करू.सत्ताधा-यांना निधी खर्च न करता येणे दुर्दैवमनसेचे नगरसेवक व गट नेते दौलतराव पाटील म्हणाले, रौप्यनगरीच्या विकासासाठी राज्यशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सत्ताधारी भाजपचे अकार्यक्षम कारभारी हा निधी खर्च करून शहराचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेत. शहराच्या विकासासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सत्ताधाºयांना जर शहराचा विकास करता येत नसेल, तर हे शहरवासियांचे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाfundsनिधी