शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:41 IST

Dam Kolhapur : वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांची जमीन केळोशी प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत .

ठळक मुद्देवीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  : गेल्या वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड ' ओढयावर आज लोंढा - नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षापासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरवात केल्याने शेताशिवार हिरवेगार झाले आहेत. पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त  'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत.केळोशी बुकक (ता . राधानगरी ) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८ मध्ये ५६०३ .२२५ घनमीटर साठवण क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरवात झाली. काम दोन तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता.

आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल असा हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता .पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व कामास सुरवात झाली.या घटनेला आता जवळपास २० वर्षे लोटली. सबंधीत शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनिच्या बदल्यातल्या जमिनी देऊ करा म्हणुन या वीस वर्षात किती हेलपाटे शासन दरबारी मारले याला गणितच नाही.

गेल्या चार वर्षापासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत, त्यांची शेती हिरवाईने नटली आहे. पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही उपेक्षितच आहेत . त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला, ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमिन म्हणत आपले गाऱ्हाने 'लोकमत ' कडे मांडले आहे .

  • धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४,८१२ ,८२०,९०५,८८० , ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या गटाचा पसंती क्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे ! 
  •  संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी देय देण्यासाठी धरणाचे काम सुरू असताना अनेक वेळा काम बंद आंदोलन केले होते. पण ठेकेदारानेही वेळ मारून नेत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे .
टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर