शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:41 IST

Dam Kolhapur : वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांची जमीन केळोशी प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत .

ठळक मुद्देवीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  : गेल्या वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड ' ओढयावर आज लोंढा - नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षापासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरवात केल्याने शेताशिवार हिरवेगार झाले आहेत. पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त  'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत.केळोशी बुकक (ता . राधानगरी ) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८ मध्ये ५६०३ .२२५ घनमीटर साठवण क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरवात झाली. काम दोन तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता.

आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल असा हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता .पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व कामास सुरवात झाली.या घटनेला आता जवळपास २० वर्षे लोटली. सबंधीत शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनिच्या बदल्यातल्या जमिनी देऊ करा म्हणुन या वीस वर्षात किती हेलपाटे शासन दरबारी मारले याला गणितच नाही.

गेल्या चार वर्षापासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत, त्यांची शेती हिरवाईने नटली आहे. पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही उपेक्षितच आहेत . त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला, ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमिन म्हणत आपले गाऱ्हाने 'लोकमत ' कडे मांडले आहे .

  • धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४,८१२ ,८२०,९०५,८८० , ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या गटाचा पसंती क्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे ! 
  •  संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी देय देण्यासाठी धरणाचे काम सुरू असताना अनेक वेळा काम बंद आंदोलन केले होते. पण ठेकेदारानेही वेळ मारून नेत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे .
टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर