शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

पूरग्रस्तांना मदतवाटपाचे पारदर्शी आरे मॉडेल --(ऑन द स्पॉट रिपोर्ट )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:29 AM

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे.

विश्र्वास पाटील -कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथे महापुरात नुकसान झालेल्या लोकांना अत्यंत सुत्रबध्दरित्या मदतीचे वाटप सुरु आहे. त्या गावांत मदत घेवून जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून त्याबध्दल कौतुक व्यक्त होत आहे. पूरग्रस्त अनेक गावांमध्ये आलेल्या मदतीवरून मारामाºया सुरु झाल्या आहेत. मदतीची पळवापळवी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या गावाचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. धान्य स्वरुपातील मदत आता पाठवू नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक टायर ट्रॅक्टर व बुलडोझर असणारे हे गांव आहे. एकूण शेतीखालील जमिन आणि लोकसंख्या याचा विचार करता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही गाव जिल्ह्यांत पहिल्या पाचमध्ये येईल इतके हे समृध्द गांव परंतू महापुराने मोठे नुकसान केले. महापुरात गावाचे शंभर टक्के स्थलांतर नवीन वसाहतीत झाले. आता या संकटानंतर गावाच्या मदतीला साºया महाराष्ट्रातून मदत येवू लागली आहे.

मदतवाटप समन्वय समितीगावासाठी येणारी सर्व मदत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आनंदराव खराडे यांच्या घरांत एकत्रित केली जात आहे. ज्यांना थेट ग्रामस्थांना मदत द्यायची आहे, ते जावून लोकांना मदत देवू शकतात. त्यांना पूरक सहकार्य ग्रामस्थ करत आहेत. मदतवाटप कामाचा समन्वय करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये सरपंच साक्षी कुंभार, उपसरपंच अमर वरुटे, महेश वरुटे, जयदिप मोहिते, विश्र्वास वरुटे, निवास मोहिते, एकनाथ गुरव, बबन चौगुले, पोलिस पाटील विनायक लोहार, तलाठी नरेंद्र झुंबड व ग्रामसेवक दीपा यादव यांचा समावेश आहे.  

मदत वाटप सुत्र ---गावची लोकसंख्या २८५४. पूरबाधित कुटुंबे : २९० :  पूरग्रस्त लोकसंख्या : १४८६. पडलेली घरे : ३२समितीने तातडीने घर टू घर जावून सर्व्हे करून पूरग्रस्तांची संख्या निश्चित केली. त्यानुसार प्रत्येकी ५ किलो तांदूळ, गहू, आट्टा, एक किलो खाद्यतेल, प्रत्येकी १ किलो कांदा व बटाटे, मिनरल वॉटर कुटुंबासाठी रोज ५ लिटर आणि एका कुटुंबासाठी १ किलो चटणी असे सुत्र निश्चित केले.मदत वाटली कशी..आलेल्या मदतीची पॅकेट तयार होती. मदत वाटपाचे रजिस्टर घालून प्रत्येक कुटुंबास रोज एक टोकन दिले जाते. रजिस्टरवर कुटुंब प्रमुखाची सही घेतली जाते. त्यानंतर ते टोकून जमा केल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळते. रोज सकाळी १० ते १ पर्यंत हे काम गावांतील तरुण कार्यकर्त्याच्या सहकार्याने चालते. त्याची आदल्यादिवशी गावांत दवंडी दिली जाते.काय साधले..सुत्रबध्दपणे मदत वाटप सुरु असल्याने पूरग्रस्त लोकांना त्याचे अत्यंत पारदर्शीपणाने वाटप झाले. मला मदत मिळाली नाही किंवा कुणाला जास्त मिळाली याबद्दल कुणाचीही एकही तक्रार नाही. सर्व राजकीय गट एकत्र येवून गावाचे काम म्हणून या गोष्टीकडे पाहिल्याने कुठेच अडचण आली नाही.मदत केली कुणी..औरंगाबादहून संभाजी ब्रिगेड : २ ट्रक धान्यपुण्यातून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई : १ ट्रक धान्य व ब्लँकेटतूळजापूर देवस्थान : १ ट्रक धान्य व कपडेचर्मकार सेवा संस्था कणकवली : धान्यशिवसाम्राज्य फाऊंडेशन फोंडाघाट : धान्य व औषधेपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती : १ ट्रक धान्यभोसरीचे आमदार महेश लांडगे : धान्य १ ट्रक व एक ट्रक कडबाकुट्टी पृथ्वी एंटरप्रायजेस पूईखडी (कोल्हापूर) : ४० कुटुंबांना भांडी सेटअर्थमुव्हर्स असोसिएशन : पशुखाद्यपंख फाऊंडेशन कोल्हापूर : कपडे व खाद्यतेलआरोग्य तपासणी : अ‍ॅस्टर आधार, सावली केअर सेंटर, कणेरी मठ रुग्णालयदापोली व बेले ग्रामस्थ : घरांची पडझड झालेल्या ३२ कुटुंबाना दापोली (जि.रत्नागिरी) ग्रामस्थांकडून प्रत्येकी ४ हजारांची व बेले (ता. करवीर) ग्रामस्थांकडून प्रत्येकी १ हजारांची रोख मदत(याशिवाय छोट्यामोठ्या  विविध १५० संस्थांकडून विविध प्रकारची मदत)

  • मेस्त्री धावून आले.

बीडशेड (ता. करवीर) ९ मेस्त्री महापूर उतरल्यावर एकादिवशी आपापले साहित्य घेवून आले व त्यांनी दिवसांत १८० मोटारसायकली मोफत दुरुस्त करून दिल्या.

  • दिवसांत वीजपुरवठा..

गावांतील ज्या घरांतील वीज पुरवठा खंडित झाला होता अशा सर्व घरांमध्ये चार वायरमननी दिवसभर राबून वीजपुरवठा दुरुस्त करून दिला.

  • थेट जेवणाची मदत

महापुराच्या काळात व पूर ओसरल्यानंतरही बाचणी, कारभारवाडी, सडोली खालसा, सावरवाडी, म्हाळुंगे, बेले, येळवडे, सोनाळी, हसूर, कोथळी ही गांवे अक्षरक्ष: धावून आली. त्यांनी जेवून करून आणून पूरग्रस्तांना वाढले. माहेरवाशिणींना दुरड्या भरून शिदोरी देतात तसे या गावांतून महिलांनी जेवण पोहोच केले.

  • मदत काय काय मिळाली

तांदूळ, आटा,खाद्यतेल, चटणी,कपडे, साड्या ड्रेस, ब्लँकेट, बेडशीट, चादरी, टॉवेल, भांडी सेट,टूथब्रश, शालेय साहित्य आणि पिण्याचे पाणी

आरे गावांचे मला दोन गोष्टीसाठी कौतुक वाटते. त्यांनी ज्यापध्दतीने महापुरात तातडीने लोकांचे व जनावरांचे स्थलांतर केले ते जास्त महत्वाचे होते. त्यामुळे जिवितहाणी झाली नाही. मदत वाटपाची पध्दतही अत्यंत छान असून त्यामध्ये समानता आहे. हे अन्य गावांनी आपत्तीव्यवस्थापन व मदत कार्याचे मॉडेल म्हणून वापरता येण्यासारखे आहे.डॉ. किमया शहाविश्वस्त, लोटस मेडिकल फाऊंडेशन कोल्हापूर 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर