शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वाहतूकदारांनी महामार्ग रोखला : पाचशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:07 AM

कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनजीवनावर अद्यापही थेट परिणाम झाला नसला तरी तरीही पाचशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून आंदोलन ...

कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनजीवनावर अद्यापही थेट परिणाम झाला नसला तरी तरीही पाचशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला असून यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसू शकते.आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने वारंवार होणारी इंधन दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शी करावी, ‘थर्ड पार्टी’ विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी, जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणाºया विलंबात सुधारणा करावी, पर्यटन वाहनासाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे, आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीर आकारणी होणारा आयकर रद्द करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांकरिता हा चक्काजाम सुरू करण्यात आला आहे. यात देशभरातील मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत.रविवारी जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनतर्फे विविध गट तयार करून महामार्गावर वाहतूक रोखण्याचे काम सुरू होते. यात मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली, आदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील वाहतूक रोखली जात होती. यातील ट्रकचालकांना वाहने रस्त्याकडेला लावण्याची सक्ती केली जात होती.इचलकरंजीतील २५० कोटींची उलाढाल ठप्पवाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाचा येथील वस्त्रोद्योगावर परिणाम दिसू लागला असून, दररोजची २५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. कापड व्यापाºयांकडून यंत्रमाग कापडाचे सौदे रद्द करण्याची स्थिती निर्माण झाल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे.शहरामधील यंत्रमागावर कापड विणण्यासाठी आवश्यक असलेल्या सुतापैकी सुमारे ८० टक्के सूत दक्षिणेतील तामिळनाडू व आंध्र राज्यातून येते. तसेच येथे उत्पादित झालेले कापड गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील पेठांमध्ये विक्री केले जाते. २० जुलैपासून सुरू झालेल्या वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनामुळे सुताची आवक ठप्प झाली आहे. तसेच येथून जाणाºया कापडाची वाहतूकसुद्धा बंद पडली आहे. कापडाची जावक बंद झाल्याने कापड खरेदी करणाºया व्यापाºयांकडून यापूर्वी केलेले सौदे रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दररोज येणारे आणि जाणारे कापड यांची सुमारे २५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असते. संपामुळे सूत व कापड यांची वाहतूक ठप्प झाल्याने ही आर्थिक उलाढाल बंद पडण्याची शक्यता आहे.आर्थिक कोंडी होण्याची भीतीवस्त्रोद्योगात मंदीच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलनाचा अवघ्या दोन दिवसांतच वस्त्रोद्योगावर परिणाम दिसत आहे. कापड व्यापाºयांकडून कापडाची डिलिव्हरी घेण्याचे बंद झाले असून कापडाचे चेकींगसुद्धा ठप्प झाले आहे.