शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

चिपरी येथे कचरा टाकल्यास ‘दंगल’

By admin | Updated: March 7, 2017 21:51 IST

चिपरी ग्रामस्थ आक्रमक : जयसिंगपूर पालिकेला इशारा

जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात चिपरी येथील खाणीत पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. गावच्या आरोग्यासाठी ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यासाठी प्रसंगी व्यापक आंदोलन उभारतील, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी माहिती देताना सेवानिवृत्त सहा. फौजदार राजाराम माने व आम आदमी पाटीर्चे विलास रजपूत म्हणाले, जयसिंगपूर शहारातील कचरा टाकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिपरी हद्दीतील दगड खाणीची जागा पालिकेला दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पालिकेचा कचरा टाकण्यात येत होता. दगड खाणीत पाण्याचे पाझर आहेत. यामुळे चिपरी परिसरातील कूपनलिका आणि विहीरींचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने १ जानेवारीपासून याठिकाणी कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला होता. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. जयसिंगपूर पालिकेच्या २ मार्चला झालेल्या सभेत कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी न्यायालयाची बाजू सांगून प्रसंगी पोलिस बंदोबस्तात चिपरी येथे कचरा टाकणार असल्याचे सांगितले होते. यावर चिपरी ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत. सोमवारी चिपरी ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. जयसिंगपूर पालिकेकडून घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होते. आता पोलिस बंदोबस्तात पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी महादेव माने, गजानन माळी, तंटामुक्त अध्यक्ष रमेश रजपूत, अनिल मगदूम, आप्पासाहेब कोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)