शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू ठेवण्यावरून टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे, खते विनाव्यत्यय उपलब्ध व्हावीत म्हणून राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिवसभर केंद्र सुरू ठेवण्याबाबत ...

कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे, खते विनाव्यत्यय उपलब्ध व्हावीत म्हणून राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिवसभर केंद्र सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे लेखी आदेश काढले होते. याला आठ दिवसांचा कालावधी लाेटला तरी अद्याप टोलवाटोलवी सुरू असल्याने शेतकऱ्यांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्गदर्शन करावे, असे सांगत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने १५ मे पर्यंत सुरू असलेल्या जनता कर्फ्यूअंतर्गत सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक खरेदीला मुभा दिला आहे. कृषी सेवा केंद्रेही याच वेळेत खुली राहतात. वास्तविक सकाळची वेळ ही शेतकऱ्यांसाठी शिवारात राबण्यासाठीची असते. उन्हाचा तडाखा कमी असल्याने याचवेळी कामे होतात. खरेदी असल्यास सहसा दुपारीच होते; पण ११ ला दुकाने बंद करण्याच्या नियमामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

खरीप हंगाम हा सर्वांत मोठा असल्याने आणि प्रत्यक्ष पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचाच कालावधी राहिल्याने आता ही वेळ शेतकऱ्यांबरोबरच कृषी सेवा केेंद्र चालकांसाठी लगीनघाईसारखीच असते; पण नेमके याच वेळी निर्बंध लावल्याने वर्षानुवर्षांचे चक्रच विस्कळीत झाले आहे. यातून मार्ग काढून सवलत द्यावी अशी मागणी होत होती. याची दखल घेत कृषी आयुक्तांनी आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, आज उद्या करत याच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात कोराेनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने दिवसभराची मुभा देणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.

चौकट

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र : दोन लाख २६ हजार हेक्टर

एकूण कृषी सेवा केंद्रे : १८७२

प्रतिक्रिया

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर लगेचच याबाबतीतील निर्णय घेतला जाईल.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी