शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये ...

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये २८९ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमधील वातावरण पाहून पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्हाभर खासगी आणि इंग्रजी शाळांची संख्याही भरमसाठ वाढलीे. याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळांवर झाला. मात्र, सध्या जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने या शाळांकडे कल वाढला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल विद्यार्थीतालुका प्रवेशित इंग्रजी माध्यमातून खासगी शाळेतून एकूणशाळा जि. प. शाळेत जि. प. शाळेतआजरा ९ ३७ ११ ४८भुदरगड १७ ५३ २४ ७७चंदगड २२ ४४ १६ ६0गडहिंग्लज ५२ १00 ७२ १७२गगनबावडा ३ ५ 0 ५हातकणंगले ३९ ८४ ८0 १६४कागल ६२ १८३ 0 १८३करवीर ८९ २८९ २५८ ५४७पन्हाळा ३२ ६४ २६ ९0राधानगरी ३६ ८0 १ ८१शाहूवाडी २२ ७४ १३ ८७शिरोळ ४२ १0६ ६८ १७४एकूण ४२५ १११९ ५६९ १६८८जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के डिजिटल शाळा, माध्यान्ह भोजन योजना, विज्ञान प्रयोगशाळा, इस्रो भेट असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला जात असून, याचाच परिणाम म्हणून जि.प.च्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.- अंबरीश घाटगे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूरसर्व शिक्षा अभियान, ज्ञानरचनावादी शिक्षण, शाळाबाह्य व दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची सुविधा अशा अनेक योजनांमुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षेचे निकाल उच्च दर्जाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करून पालक निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश होत आहेत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर