शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

झटपट ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीने इतिहासाचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:25 AM

सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु

ठळक मुद्दे विश्वास पाटील यांचे प्रतिपादन : शिवाजी तरुण मंडळातर्फे आयोजित व्याख्यान

कोल्हापूर : जादा पैशांच्या मोहात कमी वेळेत झटपट ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करून इतिहासाचे तीन-तेरा वाजविण्याचे काम होत आहे. त्यामुळे मूळ इतिहास समोर येत नाही. त्यासाठी अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुरेसा वेळ व इतिहासाचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ‘पानिपत’कार लेखक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठ्यांनी तब्बल २५ वर्षे दिल्लीवर भगवे निशाण फडकाविले होते, असेही त्यांनी सांगितले.

उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथे शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘पानिपतच्या लढ्याची रोमांचकारी शौर्यगाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक व्ही. बी. पाटील होते. प्रमुख उपस्थिती मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव, प्राचार्य व्ही. एम. पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, चंद्रकांत साळोेखे, अशोकराव साळोखे, अजित नरके, रवींद्र साळोखे, रोहित मोरे, सुरेश जरग, अनिल देशपांडे, आदींची होती.

विश्वास पाटील म्हणाले, पानिपतची लढाई समजून घेताना राष्टÑाचा नकाशासमोर आणावा लागेल; कारण त्यावेळी मराठ्यांचा दबदबा सिंधूपासून रामेश्वर व बंगालपर्यंत होता.पानिपतची लढाई ही मुस्लिमविरोधी नव्हती; तसेच ती ब्राह्मणांचीही नव्हती; कारण त्यावेळी मराठा साम्राज्यात

सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु तत्कालीन संदर्भ आणि वस्तुस्थिती पाहता त्यांमध्ये फारसे तथ्य दिसत नाही.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहासcinemaसिनेमा