कोल्हापूर : जिल्ह्यातील गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या डोंगराळ तालुक्याची वाटचाल अलिकडे कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सामाजिक अंतर चांगले राहत असल्याने आणि ६० वर्षांवरील लोकांचे लसीकरणाचे प्रमाण चांगले झाल्याने या तालुक्यातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याउलट चित्र कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील इतर निमशहरात आहे.
कोरोनाची दुसरी लाट आरोग्य प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. पहिल्या लाटेत पुणे, मुंबईची चाकरमानी परतल्याने डोंगराळ तालुक्यात कोरोनाचे रुग्णसंख्या अधिक होती. त्यांच्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, असाही समज निर्माण झाला होता. पण दुसऱ्या लाटेत हे चित्र उलटे झाले आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच निमशहरात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याउलट ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्तांमध्ये लसीकरण जास्त झालेल्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने लसीकरणाची मोहीम गतिमान केली आहे. रुग्ण शोध मोहीम आणि तपासण्याही वाढवल्या जात आहेत. परिणामी रुग्णांची संख्या कमी होत आहे.
आतापर्यंत झालेल्या चाचण्या -८५९७६६
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - १५.६
रुग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) - ८७.८
एकूण रुग्ण - १३४४९४
बरे झालेले रुग्ण - ११८१५९
उपचार सुरू असलेले रुग्ण - १२१३०
मृत्यू - ४२०५
तालुकानिहाय बाधित रुग्ण
आजरा : ५२१
भुदरगड : ३६१
चंदगड : २८९
गडहिंग्लज : ५६९
गगनबावडा : ७५
हातकणंगले : १५४८
कागल : ६००
करवीर : २६२५
पन्हाळा : ७६५
राधानगरी : ३८१
शाहूवाडी : ३०६
शिरोळ : ६६८
नगरपालिका कार्यक्षेत्र :७८५
महापालिका कार्यक्षेत्र : २३९३
इतर जिल्ह्यातील रुग्ण : २४४
कोट
डोंगराळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. या तालुक्यात ६० वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. शिवाय सामाजिक अंतरही येथे चांगले राहते. याउलट निर्बंध शिथिल केल्यानंतर कोल्हापूर शहर, हातकणंगले, करवीर आदी तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट
निर्बंध शिथिल केल्याने रुग्ण संख्या वाढली
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे दळण वळण वाढणे आहे. अनेक ठिकाणी सामाजिक अंतरही काटेकोरपणे पाळले जात नाही. यामुळे रुग्ण संख्या वाढली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही येथे अधिक आहे.