शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Kolhapur: खानापुरात कुटुंबातील तिघांना बांधून घालून घातला दरोडा, चोरट्यांनी २२० डुकरे पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 10:53 IST

सदाशिव मोरे आजरा : खानापूर पैकी रायवाडा (ता. आजरा) येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून अज्ञात २० ते २५ ...

सदाशिव मोरेआजरा : खानापूर पैकी रायवाडा (ता. आजरा) येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून अज्ञात २० ते २५  जणांच्या टोळीने दरोडा घातला. यामध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदी, काजूगर व रोख रक्कमेसह याॅकशार्क प्रकारची २२० पाळीव डुकरे पळवली आहेत. ही घटना रात्री दोनच्या सुमारास चिरका नावाच्या शेतात घडली.चोरट्याने रात्री दहशत माजवत दरवाजे तोडले. प्रल्हाद राजाराम गुरव, पुनम प्रल्हाद गुरव व राजेश प्रल्हाद गुरव या तिघांना मारहाण करीत बांधून घातले. तोंडाला बांधल्यामुळे त्यांना आरडाओरडाही करता आला नाही. यावेळी चोरट्यांनी २० लाखांची २२० पाळीव डुकरे, १ लाख ५० हजार किमतीचा २०० किलो काजूगर, ४ लाख २० हजारांचे ७ तोळे सोने, १ लाख ५० हजारांचे १५ किलो चांदी व रोख रक्कम ३० हजार, दोन मोबाईल यासह अन्य घरगुती अंदाजे ३० लाखांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यानी केलेल्या मारहाणीत प्रल्हाद गुरव, पूनम गुरव व राजेश गुरव जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस