शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Russia-Ukraine crisis: लेकी अडकल्या युक्रेनमध्ये, पालकांच्या जीवाला घोर; कोल्हापूरच्या तीन विद्यार्थिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:45 IST

भारतीय दूतावासाने त्यांना बसने रुमानियाला पाठविले आहे, तेथून दाेन भारतीय विमानांनी सर्वांना दिल्लीत आणण्यात येईल.

कोल्हापूर : एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या व काळजाचा तुकडा असलेल्या लेकी युक्रेनमध्ये अडकल्याने कोल्हापुरात पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. येथील तीन विद्यार्थिनी युक्रेनमधील बुकोविनीयन विद्यापीठात असून, त्यांना भारतीय दूतावासाने रुमानियाला हलवले आहे. तेथून विमानाने त्या दिल्लीला येणार असून, येथे सुरक्षित पोहोचेपर्यंत पालकांचा जीव मात्र कासावीस झाला आहे. सोमवारपर्यंत त्या कोल्हापूरला परतण्याची शक्यता आहे.कदमवाडीतील प्राजक्ता पाटील, फुलेवाडी येथील ऋतुजा कांबळे, शुक्रवार पेठेतील आर्या चव्हाण या तिघी युक्रेनमध्ये शिकत आहेत. गुरुवारी युक्रेनवर हल्ले सुरू झाल्यानंतर त्या आणि पालक सगळेच घाबरले. पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

व्हिडिओ कॉलद्वारे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पालक या तिघींशी बोलले आहेत. त्या सुखरूप आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामी करण्यास सांगितले असून, भारतीय दूतावासाने त्यांना बसने रुमानियाला पाठविले आहे, तेथून दाेन भारतीय विमानांनी सर्वांना दिल्लीत आणण्यात येईल.कदमवाडीतील निवृत्त सैनिक सुनील पाटील यांची मुलगी प्राजक्ता ही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. सामानाची बांधाबांध करण्याची घाई असल्याने ती पालकांशीदेखील फार बोलू शकली नाही. रुमानियाला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या यादीत अजून तिचे नाव आले नव्हते.

मात्र हॉस्टेलने जेवण बंद केल्याने जवळ असलेले खाद्यपदार्थ ती पुरवून पुरवून खात आहे. शुक्रवार पेठेतील रेशन दुकान व्यावसायिक नितीन चव्हाण यांची मुलगी आर्या व फुलेवाडी येथील प्राध्यापक जेलीत कांबळे यांची मुलगी ऋतुजा यांनी याच वर्षी एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. पालकांशी शेवटचे बोलणे झाले त्यावेळी त्या बसमधून रुमानियाला निघाल्या होत्या.

गेली दोन वर्षे माझी मुलगी युक्रेनमध्ये आहे. दोन्ही देशांत चर्चा सुरू असल्याने युद्धाची वेळ येणार नाही असे वाटले होते. पण, हल्ले सुरू झाल्यापासून धडकीच भरली. प्राजक्ता सुखरूप आपल्या देशात परतेपर्यंत चैन पडणार नाही. - सुवर्णा पाटील, प्राजक्ता पाटीलची आई 

युद्धजन्य परिस्थितीमुळे २० तारखेपासूनच आम्ही विमानाच्या बुकींगसाठी प्रयत्न करीत होतो. उद्याचे (शनिवार) तिकीट काढले होते. दरम्यान, हल्ले सुरू झाले आणि विमानतळ बंद झाले. हा परिसर युद्धापासून सुरक्षित आहे. आमचं बोलणं झालं तेंव्हा ऋतुजा रुमानियाला निघाली होती. -जेलीत कांबळे, ऋतुजा कांबळेचे वडील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी