शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Russia-Ukraine crisis: लेकी अडकल्या युक्रेनमध्ये, पालकांच्या जीवाला घोर; कोल्हापूरच्या तीन विद्यार्थिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:45 IST

भारतीय दूतावासाने त्यांना बसने रुमानियाला पाठविले आहे, तेथून दाेन भारतीय विमानांनी सर्वांना दिल्लीत आणण्यात येईल.

कोल्हापूर : एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या व काळजाचा तुकडा असलेल्या लेकी युक्रेनमध्ये अडकल्याने कोल्हापुरात पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. येथील तीन विद्यार्थिनी युक्रेनमधील बुकोविनीयन विद्यापीठात असून, त्यांना भारतीय दूतावासाने रुमानियाला हलवले आहे. तेथून विमानाने त्या दिल्लीला येणार असून, येथे सुरक्षित पोहोचेपर्यंत पालकांचा जीव मात्र कासावीस झाला आहे. सोमवारपर्यंत त्या कोल्हापूरला परतण्याची शक्यता आहे.कदमवाडीतील प्राजक्ता पाटील, फुलेवाडी येथील ऋतुजा कांबळे, शुक्रवार पेठेतील आर्या चव्हाण या तिघी युक्रेनमध्ये शिकत आहेत. गुरुवारी युक्रेनवर हल्ले सुरू झाल्यानंतर त्या आणि पालक सगळेच घाबरले. पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

व्हिडिओ कॉलद्वारे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पालक या तिघींशी बोलले आहेत. त्या सुखरूप आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामी करण्यास सांगितले असून, भारतीय दूतावासाने त्यांना बसने रुमानियाला पाठविले आहे, तेथून दाेन भारतीय विमानांनी सर्वांना दिल्लीत आणण्यात येईल.कदमवाडीतील निवृत्त सैनिक सुनील पाटील यांची मुलगी प्राजक्ता ही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. सामानाची बांधाबांध करण्याची घाई असल्याने ती पालकांशीदेखील फार बोलू शकली नाही. रुमानियाला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या यादीत अजून तिचे नाव आले नव्हते.

मात्र हॉस्टेलने जेवण बंद केल्याने जवळ असलेले खाद्यपदार्थ ती पुरवून पुरवून खात आहे. शुक्रवार पेठेतील रेशन दुकान व्यावसायिक नितीन चव्हाण यांची मुलगी आर्या व फुलेवाडी येथील प्राध्यापक जेलीत कांबळे यांची मुलगी ऋतुजा यांनी याच वर्षी एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. पालकांशी शेवटचे बोलणे झाले त्यावेळी त्या बसमधून रुमानियाला निघाल्या होत्या.

गेली दोन वर्षे माझी मुलगी युक्रेनमध्ये आहे. दोन्ही देशांत चर्चा सुरू असल्याने युद्धाची वेळ येणार नाही असे वाटले होते. पण, हल्ले सुरू झाल्यापासून धडकीच भरली. प्राजक्ता सुखरूप आपल्या देशात परतेपर्यंत चैन पडणार नाही. - सुवर्णा पाटील, प्राजक्ता पाटीलची आई 

युद्धजन्य परिस्थितीमुळे २० तारखेपासूनच आम्ही विमानाच्या बुकींगसाठी प्रयत्न करीत होतो. उद्याचे (शनिवार) तिकीट काढले होते. दरम्यान, हल्ले सुरू झाले आणि विमानतळ बंद झाले. हा परिसर युद्धापासून सुरक्षित आहे. आमचं बोलणं झालं तेंव्हा ऋतुजा रुमानियाला निघाली होती. -जेलीत कांबळे, ऋतुजा कांबळेचे वडील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी