शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

By admin | Updated: December 7, 2014 00:47 IST

काळाने गाठलं की वेळेत पोहोचायचं : महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांची धाडसी ‘माणुसकी’

माणिक डोंगरे / मलकापूरअपघात म्हटलं की बघ्यांची गर्दी; पण मदत करणाऱ्यांची वानवा, असे चित्र दिसते. महामार्गावर तर हे चित्र रोजचेच. मात्र, महामार्ग देखभाल विभाग कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे आजपर्यंत अनेकांना जीवदान मिळालंय. २०१४ या एका वर्षात १४० अपघातांतील सुमारे ३०० जखमींना देखभालच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचलीय. त्यामुळे त्या जखमींचा जीव बचावलाय. या धाडसी व समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पोलिसांसह रुग्णालयांनीही संबंधित कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे.शेंद्रे ते पेठनाका हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा ८४ किलोमीटरचा पट्टा अपघातप्रवण पट्टा समजला जातो़ कऱ्हाड तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात घडल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे़ २०१४ या चालू वर्षात ८४ किलोमीटर पट्ट्यात एकूण १४० लहान-मोठे अपघात झाले आहेत़ त्यामध्ये ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सुमारे ३०० जण जखमी झाले आहेत़ जखमींपैकी १५३ जणांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून अनेकांना आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत़ १४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ अपघात म्हटलं की मदत हा तातडीचा पर्याय जखमींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो़ दिवसेंदिवस मदतीची भूमिका लोप पावत असल्यामुळे अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जास्त होते़ अशा बाबींना छेद देत महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी मात्र अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जातात़ कोणाताही विचार न करता जखमींना तातडीने रूग्णालयात पाठवून देतात़ या त्यांच्या तत्पर सेवेमुळे २०१४ या एका वर्षात सुमारे ३०० जखमींना जीवदान मिळाले आहे़ जखमींना मदत करण्याचे काम हे कर्मचारी रात्री-अपरात्री व चोख पध्दतीने पार पाडत आहेत़ ही त्यांची कार्य तत्परता विचारात घेता कृष्णा रूग्णालयासह इतर रूग्णालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आह़े हीच माणुसकी समाजातील इतर तरूणांना आदर्श घेण्यासारखी आहे़