शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. गोकुळ एकाच्या ताब्यात असून, तो सर्वसामान्य सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पेठवडगाव येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभा झाली. यावेळी आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदचे अर्थ सभापती प्रवीण यादव, विजयसिंह माने, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिकांचे अर्थकारण ‘गोकुळ’वर अवलंबून आहे. यामुळे कधीही रस्त्यावर न दिसणारे महाडिक गावोगावी फिरत आहेत. स्वत:च्या नावावर टँकर, जावयांच्या नावावर एजन्सी, वासांचे दूध व पशुखाद्यावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

आमदार राजू आवळे म्हणाले, जिल्ह्याची संस्था जिल्ह्यात राहिली आहे. मल्टिस्टेट झाले असते तर पश्चात्ताप करण्याची वेळ आली असती. यामध्ये कर्नाटक, इस्लामपूरचे मतदार वाढले असते. त्यामुळे सभासदांना किंमत मिळाली नसती. एकदा बदल घडविण्याची गरज आहे. सहकाराला प्रतिष्ठा देण्यासाठी एकवेळ संधी द्यावी तसेच मिणचेकर यांच्या रूपाने अठरा वर्षांनी तालुक्याला संधी मिळाली आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील. तसेच महाआघाडी म्हणून यापुढे एकत्र राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुरलीधर जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, नावेद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसनबापू चौगुले, बायजी शेळके, अभिजीत तायशेट्ये, सुश्मिता पाटील, रंजना रेडेकर, अभिजीत माने, शिरोली सरपंच शशिकांत खवरे, सचिन चव्हाण, चेतन चव्हाण उपस्थित होते.

चौकट : तर कर्नाटकच्या सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते

दूध उत्पादकांसाठीच्या लढाईत मल्टीस्टेटला विरोध करून या परिवर्तन लढाईची सुरुवात सभासदांना घेऊन केली आहे. सभासदांनी साथ दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे अन्यथा कर्नाटकातील सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते. ही लढाई सत्तेसाठी नसून, दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. यामुळे आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांचे सुपुत्र अभिजीत माने हे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभेत उपस्थित होते.