शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

करवीरपीठाच्या जमिनी अडकल्या लालफितीत, आठ वर्षांनंतरही पीठाकडे हस्तांतरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:28 AM

शासनाने आठ वर्षांपूर्वी आदेश देऊनही श्री शंकराचार्य करवीरपीठाच्या हजारो एकर जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पीठाकडे हस्तांतरित होऊ शकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या जमिनींची शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा करावी, असे आवाहन शंकराचार्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ठळक मुद्देकरवीरपीठाच्या जमिनी अडकल्या लालफितीतआठ वर्षांनंतरही पीठाकडे हस्तांतरण नाही

कोल्हापूर : शासनाने आठ वर्षांपूर्वी आदेश देऊनही श्री शंकराचार्य करवीरपीठाच्या हजारो एकर जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पीठाकडे हस्तांतरित होऊ शकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या जमिनींची शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा करावी, असे आवाहन शंकराचार्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.करवीरपीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीठाच्या देखभालीसाठी दान मिळालेल्या जमिनी नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने स्वत:च्या व कुटुंबाच्या नावे करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१० साली अधिवेशनात आमदार संजय जाधव, रवींद्र दत्ताराम वायकर, संजय पांडुरंग शिरसाट, संजय भास्कर रायमूलकर यांनी पीठाच्या जमिनी नियमबाह्य हस्तांतरित झाल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी राधानगरी, गडहिंग्लज व करवीर तालुक्यात जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याची बाब चौकशीत आढळून आलेली आहे.

या जमिनीबाबत तहसीलदारांकडून चौकशी सुरू असून, तीन महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. या घटनेला आठ वर्षे झाल्यानंतर जमिनीचे हस्तांतरण तर दूरच, पण शासकीय स्तरावर ताकतुंब्याचा प्रकार सुरू आहे.याबाबत शंकराचार्य म्हणाले, पीठाच्या हजारो एकर जमिनी आहेत. त्याची मालकी जरी पीठाची असली, तरी त्या शेतकरीच कसत आहेत. आमची फक्त एवढीच मागणी आहे की, या शेतकऱ्यानी या जमिनींची योग्य ती शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा करावी.सचिव शिवस्वरूप भेंडे म्हणाले, मठाचा वाढता व्याप पाहता, खर्चाची तोंडमिळवणी शक्य नाही. पीठाच्या जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पदरमोड करून धर्मप्रसाराचे कार्य करावे लागत आहे. त्यामुळे जमिनींबाबत योग्य ती कार्यवाही करावी. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम