शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकऱ्यांच्या इंचभरही जमिनीवर आरक्षण नाही : पालकमंत्र्यांनी दिला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:07 AM

कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणाबाबत मतपरिवर्तन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृती समितीच्या नेत्यांशी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत नेत्यांनी प्राधिकरणाला मान्यता दिली

ठळक मुद्देफक्त विकासकामांवर भर; प्राधिकरणाबाबत कृती समितीच्या नेत्यांशी दोन तास चर्चामंत्री पाटील हे फक्त घोषणा करतात, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात नसतेच;

कोल्हापूर : कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणाबाबत मतपरिवर्तन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृती समितीच्या नेत्यांशी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत नेत्यांनी प्राधिकरणाला मान्यता दिली असून, गावातील शेतकºयांची इंचभरही जमीन घेतली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रथम प्राधिकरणविरोधी कृती समितीचे नेते नाथाजी पोवार, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, नारायण पोवार, बी. जी. मांगले, राजू माने यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कृती समितीच्या सर्व नेत्यांनी प्राधिकरणातील विकासाला संमती दिल्याचे सांगितले. यावेळी प्राधिकरणाचे सचिव शिवराज पाटील हेही प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राधिकरणात सुमारे ४२ गावांचा समावेश करण्यात आला असून, त्या ग्रामपंचायतींना मिळणाºया कोणत्याही निधीत कपात होणार नाही, ग्रामपंचायतीचे कोणतेही हक्क कमी होणार नाहीत, कोणत्याही शेतकºयाची जमीन विकासकामात बाधित होणार नाही.प्राधिकरणातील ४२ गावांना शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प, सांडपाणी निर्गत प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. प्राधिकरणाची विकासात्मक भूमिका नेत्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी प्राधिकरणास संमती दिल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.दसºयानंतर ४२ गावांची बैठकविजयादशमी दसºयानंतर प्राधिकरणात समाविष्ट ४२ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची खास बैठक घेऊन त्यांना प्राधिकरणाची विकासात्मक भूमिका समजावून सांगणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. विकासात्मक योजनांबाबत गावांतील प्रमुखांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत बैठक सुरूच ठेवू, असेही मंत्री पाटील म्हणाले. 

आणखी २० गावेसमाविष्ट होतीलप्राधिकरणात होणारा विकास समजावून सांगितल्यास ४२ व्यतिरिक्त आणखी २० गावे प्राधिकरणात समाविष्ट होतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.‘आम्हाला प्राधिकरण नकोच’प्राधिकरण कृती समिती नेत्यांची भूमिका : घोषणेऐवजी कायद्यात रूपांतर कराकोल्हापूर : ‘आम्हाला प्राधिकरण नकोच,’ अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी सायंकाळी प्राधिकरण कृती समितीतील नेत्यांनी घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे फक्त घोषणाच करतात, त्यांनी त्याचे कायद्यात रूपांतर करावे, तरच प्राधिकरणाबाबत विचार करू; असे मत नेत्यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रधिकरणाबाबत कृती समितीच्या नेत्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. बैठक संपल्यानंतर बाहेर कृती समितीतील नेते, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, प्रा. बी. जी. मांगले, नारायण पोवार यांनी प्राधिकरणास विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली.

मंत्री पाटील हे फक्त घोषणा करतात, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात नसतेच; त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली तिचे कायद्यात रूपांतर करावे. प्रादेशिक विकास आराखड्यात मंत्री पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचाही आरोप प्रा. बी. जी. मांगले यांनी यावेळी केला.४२ गावांत विकास शुल्क घेऊन प्राधिकरण करणार असाल तर निधी नसलेले प्राधिकरणच आम्हाला नको, असे करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी यांनी सांगितले. जोपर्यंत प्राधिकरणाचा प्रारूप आराखडा तयार होत नाही, त्यावर हरकती मागवत नाही, तोपर्यंत प्राधिकरणाचे स्पष्ट रूप ग्रामपंचायतीसमोर येणार नाही, त्यासाठी प्रथम हरकती मागवा, त्यानंतर प्राधिकरणाबाबत ठरवू, असे राजू माने यांनी सांगितले.मंत्री पाटील हे नेहमीप्रमाणे फक्त लोकप्रिय घोषणा करतात; पण त्याचे कायद्यात रूपांतर करीत नाहीत तोपर्यंत प्राधिकरणाला विरोधच राहील, अशी स्पष्ट भूमिका वडणगेचे सरपंच सचिन चौगुले यांनी घेतली.सरपंचांचाही विरोधयावेळी निगवे दुमालाचे सरपंच विक्रम कराडे, उपसरपंच पंडित लाड, वाशीचे सरपंच संदीप पाटील, निगवेचे माजी उपसरपंच दिनकर आडसूळ यांनीही प्राधिकरणच नको, अशी स्पष्ट भूमिका बोलून दाखविली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर