शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Kolhapur- शिवनाकवाडी विषबाधा प्रकरण: तब्बल एक महिन्यानी आला खीर तपासणीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:56 IST

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेतलेल्या खिरीचा अहवाल आला असून, त्यामध्ये ...

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेतलेल्या खिरीचा अहवाल आला असून, त्यामध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. पाण्याचा अहवाल अद्याप बाकी असून, या अहवालानंतरच विषबाधा कशातून झाली, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पाणी तपासणी अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.शिवनाकवाडी येथील कल्यानताई यात्रेमध्ये महाप्रसादानंतर सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. ६ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. यामध्ये बाळासो सदू आरगे (वय ६२) या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली होती.या घटनेनंतर विषबाधा नेमकी कशातून झाली, याचा शोध घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाचे खिरीचे अन्न व वापरण्यात आलेल्या पाण्याचे नमुने घेतले होते. तब्बल एक महिन्यानी खीर तपासणीचा अहवाल आला असून त्यामध्ये कोणताही दोष नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचा अहवाल अद्याप येणार असून, त्याच्या अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.

महाप्रसादातील खिरीचे अन्न आणि पाणी तपासणीसाठी घेतले होते. खिरीचा अहवाल प्रमाणित असून पाण्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. - प्रदीपा फावडे, अन्न व औषध प्रशासन सहायक संचालक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधा