शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कुंभी नदीच्या पाण्याला काळसर रंग, नदीकाठच्या अकरा गावांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:57 IST

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही.

प्रकाश पाटील

कोपार्डे : कुंभी नदीतील पाण्याला काळपट, तांबूस रंग आला आहे. याच नदीतून काठावरील ११ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजना असल्याने हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय वळवाचापाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी ओढ्यानाल्याने थेट नदीला मिळत आहे. यातून वाहत जाणारे गावागावांतील सांडपाणी थेट नदीला मिसळत आहे.

पावसाच्या हजेरीने शेतीपंप बंद असल्याने नदीच्या पाण्याचा उपसा होत नाही. बंधाऱ्यातील पाणी प्रवाहित करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देऊन नागरिकांना याबाबत पाणी उकळून पिण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा साथीच्या आजारांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाणी फिल्टरची योजना नाही

ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांना फिल्टर नाही. अनेक ग्रामपंचायती नदीतून पाणी उपसा करून ते पाण्याच्या टाकीत टाकतात व पाणी फिल्टर करण्याची योजना नसल्याने थेट आहे तसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असून यातून साथीचे रोग पसरत आहेत.

पावडर वापरण्याचे ज्ञान नाही

पाण्याचे प्रदूषित प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामपंचायती टी सेल पावडरीचा हमखास वापर करतात; पण ती वापरण्याचे ज्ञान, कौशल्य कर्मचाऱ्यांना नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त पावडरीचा वापर होतो. टी सेल पावडरीच्या अतिवापराने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांगरूळ बंधाऱ्यात अडविण्यात आलेले पाणी वाहते करण्यासाठी आरोग्य विभागाने सूचना कराव्यात; अन्यथा साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. - भगवान देसाई, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भामटे 

 कारणे शोधण्याचे शासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नाहीत. गेल्या चार-आठ दिवसांपासून नदीतील अशुद्ध पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या पातळीवर याबाबत खबरदारी घ्यावी. - दिनेश पाटील, कोपार्डे ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण