शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

By समीर देशपांडे | Updated: April 21, 2023 12:33 IST

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : एखादा प्रश्न भिजत कसा ठेवावा आणि दरवर्षी त्याबाबत नवनवीन घोषणा कशा कराव्यात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न. कारण १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही. असा एक-एक प्रश्न संपायला एक पिढी जाणार असेल तर हा विकास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे हा खरा प्रश्न आहे.सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या जिल्ह्यातील कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भाेगावती या पंचगंगेच्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांच्या प्रवाहातून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे संगम होतो आणि पंचगंगा नदीची निर्मिती होते. येथून ८१ किलोमीटरवर नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळते. या दरम्यान उभारण्यात आलेले विविध उद्योग, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, ८८ ग्रामपंचायती या कमी अधिक प्रमाणात या पंचगंगा प्रदूषणाला कारणीभूत आहेत.नेते अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत१९८९ मध्ये पंचगंगेच्या पाण्याबाबत विचारणा होऊ लागली तरी त्यावेळी इतके औद्योगिकीकरण वाढले नव्हते. पण नंतर लोकसंख्या वाढतच राहिली. औद्योगिकीकरण झाले. शहरांमध्ये लोकसंख्या केंद्रित होऊ लागली. अनेक पाणी योजनांच्या माध्यमातून माणसी रोज ४० लीटर पाणीपुरवठा होऊ लागला. साखर कारखान्यांचे डिस्टिलरी प्रकल्प उभे राहिले. एकीकडे हा सगळा विकास वेगाने होत असताना दुसरीकडे यातून निर्माण होणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु, तत्कालीन नेते आणि अधिकारी यांनी हा प्रश्न कधीच गांभीर्याने घेतला नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदने द्यायला सर्वपक्षीय झुंबड उडालेली पाहावयास मिळते.उपाययोजनांचे आदेश कागदावरच२०१२ मध्ये इचलकरंजीत काविळीच्या साथीमध्ये ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आणि नियमित आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा प्रदूषणाच्या नियमित बैठका होतात. परंतु, प्रश्न अजूनही सुटत नाही. अजूनही दरवर्षी पाणी काळे होते, मग दुर्गंधी सुटते, मासे मरतात, बातम्या येतात, मग नेतेही येतात. भाषणे ठोकतात. पंचगंगा तशीच वाहते आहे. काही ठिकाणी जलपर्णीच्या उदराखालून काही ठिकाणी काळीकुट्ट होऊन.

हे आहेत सांडपाण्यासाठी जबाबदार

  • अ. न. जबाबदार घटक विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे पाणी प्रतिदिन द.ल.लि.
  • कोल्हापूर महापालिका  -   ०६
  • इचलकरंजी महापालिका   -   २०
  • ग्रामपंचायती ८८   -  ७१.३३

मैला जात नसल्याचा दावाकोल्हापूर शहराला रोज १३० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. यातून १०४ द.ल.लि. सांडपाण्याची निर्मिती होते. यातील ९९ द.ल.लि.वर प्रक्रिया केली जाते. तर ६ द.ल.लि. सांडपाणी पाच नाल्यांतून पंचगंगा नदीत मिसळते. परंतु, या सांडपाण्यातून नदीत मैला मिसळत नसल्याचा दावा कोल्हापूर महापालिका करते तो किती खरा आणि खोटा हा संशोधनाचा विषय आहे.

बैठकांवर बैठकाउच्च न्यायालयाने सांगितले आहे म्हणून विभागीय आयुक्त कोल्हापूरमध्ये येतात. बैठका घेतात. महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मागचा आढावा घेतला जातो. उरलेले काम किती दिवसात करणार असे विचारले जाते आणि बैठक संपून जाते. या गतीने पंचगंगा नदीचे प्रदूषण संपवताना नव्याने काही प्रश्न निर्माण हाेणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण