शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भगवान महावीर अध्यासनातून उलगडणार जैन धर्माचे तत्त्वज्ञान, देशातील पहिले अध्यासन केंद्र

By पोपट केशव पवार | Updated: April 25, 2025 18:53 IST

प्रयोगातून मानवी मूल्यांची पायाभरणी : संशोधनातून चिकित्सा

पोपट पवारकोल्हापूर : सायंकाळी सहाच्या आत जेवण करा, जे आवश्यक आहे तेवढे घ्या, नको ते दुसऱ्यांना द्या, जीवनशैलीत कमीत कमी वस्तूंचा वापर करा हे जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगभरातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय असला तरी आता हेच तत्त्वज्ञान अगदी पुराव्यानिशी संशोधन करून तौलनिकदृष्ट्या शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनातून मांडले जाणार आहे. महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या अध्यासनाची ही केवळ इमारत उभी राहत नाही तर मानवी मूल्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया यानिमित्ताने रचला जाणार आहे.विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाजवळच विद्यापीठाने या इमारतीसाठी जागा दिली असून, दोन मजली इमारतीसाठी १३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी इमारत निधी समितीने एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी देणगी स्वरूपात जमा केला. याच निधीतून पहिल्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीत सभागृह, ग्रंथालय, संशोधकांसाठी खोल्या यासह विविध सुविधा असतील. उर्वरित कामासाठी शासनाकडे निधीची मागणी अध्यासनाने केली असून, तो निधी मिळाल्यानंतर पुढील काम करण्यात येणार आहे.

जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्रसध्या स्पर्धेच्या युगात अनेकजण ताणतणावाखाली आहेत. त्यामुळे ध्यानधारणा करणे क्रमप्राप्त बनले आहे. समाजाची ही गरज ओळखून या अध्यासनामार्फत जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे.

तौलनिक संशोधनावर भरजैन धर्माचे तत्त्वज्ञान आणि इतर धर्मांचे तत्त्वज्ञान यांचे तौलनिक संशोधन, अभ्यास या केंद्राच्या वतीने करण्यात येईल. जैन धर्माचा बौद्धिक दृष्टिकोन लक्षात घेऊन संशोधनात्मक लेखन, शिवाय तत्त्वज्ञानाची ओळख होण्यासाठी सोप्या भाषेतील साहित्य प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्या ७४ ग्रंथांचा होणार अभ्यासजैन धर्मात ७४ ग्रंथ आहेत. या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास करून धर्माची चिकित्सा करण्यात येणार आहे. धर्मातील चालीरीती, पूर्वपरंपरा याची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करून जे चांगले आहे ते स्वीकारणे आणि ज्याची आता गरज नाही ते सोडून देणे यावर हे अध्यासन मंथन करेल.

देशातील पहिले अध्यासन केंद्रविद्यापीठाने जागा देऊन समाजाच्या देणगीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले केंद्र आहे. महावीर अध्यासनाची इमारत पूर्णत: इको फ्रेंडली असेल. शेजारील तलावातून येणारे वारे या इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये खेळेल अशा पद्धतीने या इमारतीचा आराखडा तयार केला आहे. २००४ साली सुरू झालेल्या अध्यासनामार्फत सध्या प्रमाणपत्र व पदविका कोर्स चालविले जातात. इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर येथे पीएच.डी.सह विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.

महावीर अध्यासनाच्या नव्या इमारतीमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैन शास्त्रावरील संशोधन करणारे केंद्र निर्माण होणार आहे. - डॉ. विजय ककडे, संचालक, महावीर अध्यासन केंद्र, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ