शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

Satara-Kagal highway six lane construction: मुदत संपण्यास आठ महिने, काम कसेबसे ४५ टक्के..!

By भीमगोंड देसाई | Updated: August 14, 2025 13:28 IST

विलंबाने वाहनधारक वैतागले, दुसऱ्या टप्याचे काम ७० टक्के पूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गातील सातारा ते कागलपर्यंत १२८ किलोमीटर रस्त्यांचे सहापदरीकरण कामाचा वेग मंदावला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कागल ते पेठनाक्यापर्यंतचे काम केवळ ४५ टक्केच, तर तेथून पुढे साताऱ्यापर्यंतचे काम ७० टक्के झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग, जोडपुलाची संख्या वाढवणे, जागा बदलणे अशा स्थानिक अडथळ्यामुळे कामास विलंब होत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.सातारा ते कागल महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर केले जात आहे. ठेकेदारांनी कामावर खर्च करून ते टोलरूपाने वसूल करणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा नुकताच दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती घेतल्यानंतर हे चित्र समोर आले आहे.पेठनाका ते कागलपर्यंतच्या ६१ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरुवात झाली. यासाठी २१११ कोटींचा खर्च येणार आहे. जुलै २०२५ पर्यंत प्रत्यक्षात ४५ टक्केच काम झाले आहे. ४० टक्के रक्कम ठेकेदार कंपनीस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम ३० एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे.दुसऱ्या टप्प्यात पेठनाका ते साताऱ्यापर्यंत ६७ किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी २३३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाला मे २०२२ मध्ये सुरुवात झाली. ३१ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. जुलैअखेरपर्यंत प्रत्यक्षातील काम ७०.२४ टक्के झाले आहे. कामाची आर्थिक प्रगती ७५.९६ टक्के झाली आहे.

दृष्टीक्षेपातील काम

  • कागल - सातारा एकूण किलोमीटर : १२८ किलोमीटर
  • कामाचे दोन टप्पे : पेठनाका ते कागल पहिला टप्पा, पेठनाका ते सातारा दुसरा टप्पा
  • पहिल्या टप्प्यातील नियोजित मोठे पूल संख्या : ६
  • पुलांना जोड : २७
  • सेवा रस्त्यावर मोठे पूल : २५
  • उड्डाण पूल : नवीन ५, जुने दुरुस्त करणे ५
  • प्रमुख जंक्शन : ८
  • छोटे खानी पूल : १३६
  • दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख पूल : ५
  • सेवा रस्त्यावरील मोठे पूल : २४
  • उड्डाणपूल : २ नवीन, २ दुरुस्ती
  • छोटेखानी पूल : १८९
  • प्रमुख जंक्शन : ३६

कामाला गतीने नसल्याने वाहनधारक हैराणकागल - साताऱ्यापर्यंतच्या कामाला गती नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. वेळेचा अपव्यय होत आहे. टोल देवूनही वाहनधारकांचे इंधनावरही खर्च अधिक होत आहे.