शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

Satara-Kagal highway six lane construction: मुदत संपण्यास आठ महिने, काम कसेबसे ४५ टक्के..!

By भीमगोंड देसाई | Updated: August 14, 2025 13:28 IST

विलंबाने वाहनधारक वैतागले, दुसऱ्या टप्याचे काम ७० टक्के पूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गातील सातारा ते कागलपर्यंत १२८ किलोमीटर रस्त्यांचे सहापदरीकरण कामाचा वेग मंदावला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कागल ते पेठनाक्यापर्यंतचे काम केवळ ४५ टक्केच, तर तेथून पुढे साताऱ्यापर्यंतचे काम ७० टक्के झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग, जोडपुलाची संख्या वाढवणे, जागा बदलणे अशा स्थानिक अडथळ्यामुळे कामास विलंब होत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.सातारा ते कागल महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर केले जात आहे. ठेकेदारांनी कामावर खर्च करून ते टोलरूपाने वसूल करणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा नुकताच दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माहिती घेतल्यानंतर हे चित्र समोर आले आहे.पेठनाका ते कागलपर्यंतच्या ६१ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरुवात झाली. यासाठी २१११ कोटींचा खर्च येणार आहे. जुलै २०२५ पर्यंत प्रत्यक्षात ४५ टक्केच काम झाले आहे. ४० टक्के रक्कम ठेकेदार कंपनीस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम ३० एप्रिल २०२६ अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे.दुसऱ्या टप्प्यात पेठनाका ते साताऱ्यापर्यंत ६७ किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी २३३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाला मे २०२२ मध्ये सुरुवात झाली. ३१ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. जुलैअखेरपर्यंत प्रत्यक्षातील काम ७०.२४ टक्के झाले आहे. कामाची आर्थिक प्रगती ७५.९६ टक्के झाली आहे.

दृष्टीक्षेपातील काम

  • कागल - सातारा एकूण किलोमीटर : १२८ किलोमीटर
  • कामाचे दोन टप्पे : पेठनाका ते कागल पहिला टप्पा, पेठनाका ते सातारा दुसरा टप्पा
  • पहिल्या टप्प्यातील नियोजित मोठे पूल संख्या : ६
  • पुलांना जोड : २७
  • सेवा रस्त्यावर मोठे पूल : २५
  • उड्डाण पूल : नवीन ५, जुने दुरुस्त करणे ५
  • प्रमुख जंक्शन : ८
  • छोटे खानी पूल : १३६
  • दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख पूल : ५
  • सेवा रस्त्यावरील मोठे पूल : २४
  • उड्डाणपूल : २ नवीन, २ दुरुस्ती
  • छोटेखानी पूल : १८९
  • प्रमुख जंक्शन : ३६

कामाला गतीने नसल्याने वाहनधारक हैराणकागल - साताऱ्यापर्यंतच्या कामाला गती नसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. वेळेचा अपव्यय होत आहे. टोल देवूनही वाहनधारकांचे इंधनावरही खर्च अधिक होत आहे.