शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

By संदीप आडनाईक | Updated: February 24, 2023 19:22 IST

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, शाहिदा परवीन यांना डी.लिट. : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत सोहळा

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनावरही भर दिला पाहिजे. त्यांनी त्याचा उपयोग केवळ समाजासाठी झाला पाहिजे, हे एकच लक्ष्य डोक्यात ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी केले. येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते.हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन यांना या सोहळ्यात डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी देण्यात आली. ९ विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. एक्सलन्स इन रिसर्च म्हणून डॉ. नवनाथ पडळकर यांना सन्मानित करण्यात आले.औषधांची तीव्रता काही कालावधीनंतर कमी होत जाते म्हणून औषधांचे संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले, पदवी मिळाली हे अर्थार्जनाचे साधन झाले, एवढा मर्यादित विचार न करता त्याला संशोधनाची जोड द्या. त्यात खरे समाजहित आहे. नशीब व जादू कधीच उपयोगी पडत नाही. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास त्यासाठी मेहनतच उपयोगी ठरते, याची खूणगाठ मनाशी बांधा.

लसनिर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. सिरम आणि भारत बायोटेक्सने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. हा एक विक्रम असून, हे सर्व संशोधनामुळेच शक्य झाले. भारत औषध निर्मितीच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर आहे. वैद्यकीय सेवा आणि लस निर्मितीच्या क्षेत्रातही देशाने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधनामुळेच शक्य झाले आहे.‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, तो कोल्हापूरमुळे. त्याबद्दल माझ्या मनात कमालीची कृतज्ञता आहे.पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी शाहिदा परवीन आणि वसंत भोसले या दोन्ही सन्मानित व्यक्ती खऱ्या रोल मॉडेल असून, समाज अशाच व्यक्तींना पाहून घडत असतो, असे त्यांनी सांगितले.भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. समारंभास व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, यांच्यासह आक्काताई भोसले, मीना शेषू, जयवंत भोसले उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे आणि डॉ. निवेदिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन वाधवानी आणि पद्मजा देसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.सुलभा पन्हाळकर यांचा विशेष सन्मानडॉ. संजय आणि सतेज पाटील यांच्या शिक्षणाचा प्रारंभ ज्या गणेश विद्यालयातून झाला, त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर यांना शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते या साेहळ्यात सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ