शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

By संदीप आडनाईक | Updated: February 24, 2023 19:22 IST

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, शाहिदा परवीन यांना डी.लिट. : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत सोहळा

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनावरही भर दिला पाहिजे. त्यांनी त्याचा उपयोग केवळ समाजासाठी झाला पाहिजे, हे एकच लक्ष्य डोक्यात ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी केले. येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते.हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन यांना या सोहळ्यात डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी देण्यात आली. ९ विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. एक्सलन्स इन रिसर्च म्हणून डॉ. नवनाथ पडळकर यांना सन्मानित करण्यात आले.औषधांची तीव्रता काही कालावधीनंतर कमी होत जाते म्हणून औषधांचे संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले, पदवी मिळाली हे अर्थार्जनाचे साधन झाले, एवढा मर्यादित विचार न करता त्याला संशोधनाची जोड द्या. त्यात खरे समाजहित आहे. नशीब व जादू कधीच उपयोगी पडत नाही. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास त्यासाठी मेहनतच उपयोगी ठरते, याची खूणगाठ मनाशी बांधा.

लसनिर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. सिरम आणि भारत बायोटेक्सने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. हा एक विक्रम असून, हे सर्व संशोधनामुळेच शक्य झाले. भारत औषध निर्मितीच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर आहे. वैद्यकीय सेवा आणि लस निर्मितीच्या क्षेत्रातही देशाने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधनामुळेच शक्य झाले आहे.‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, तो कोल्हापूरमुळे. त्याबद्दल माझ्या मनात कमालीची कृतज्ञता आहे.पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी शाहिदा परवीन आणि वसंत भोसले या दोन्ही सन्मानित व्यक्ती खऱ्या रोल मॉडेल असून, समाज अशाच व्यक्तींना पाहून घडत असतो, असे त्यांनी सांगितले.भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. समारंभास व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, यांच्यासह आक्काताई भोसले, मीना शेषू, जयवंत भोसले उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे आणि डॉ. निवेदिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन वाधवानी आणि पद्मजा देसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.सुलभा पन्हाळकर यांचा विशेष सन्मानडॉ. संजय आणि सतेज पाटील यांच्या शिक्षणाचा प्रारंभ ज्या गणेश विद्यालयातून झाला, त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर यांना शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते या साेहळ्यात सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ