शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

By विश्वास पाटील | Updated: April 10, 2024 13:02 IST

कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या एकूण सतरा निवडणुकांमध्ये तब्बल बारा वेळा एकास एक लढत झाली आहे. पाचवेळा तिसरा उमेदवार जरूर रिंगणात राहिला आहे परंतु त्याला स्पर्धेतील अन्य दोन उमेदवारांपेक्षा फारच कमी मते मिळाली आहेत. याचा अर्थ असा की कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते. अनेकदा उमेदवारी जाहीर झाल्यावरच त्याचा निकाल बऱ्यापैकी स्पष्ट झालेला असतो. यंदाही दोन्ही मतदार संघांत तब्बल महिन्यापूर्वीच तसेच काहीसे वातावरण दिसत आहे.सन १९५२ व ५७ च्या निवडणुका दोन सदस्यीय पद्धतीने झाल्या. त्यामुळे कोल्हापूरने आतापर्यंत निवडणूका सतरा आणि खासदार १९ निवडले आहेत. कोल्हापूरचे वैशिष्टय असे की पक्षीय बंधन झुगारून त्यांने चांगल्या उमेदवाराला गुलाल लावला आहे. त्यामुळे दोनवेळा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. कोल्हापूर हा अत्यंत जागरूक जिल्हा आहे. त्याने आतापर्यंत स्वत:चा विकास स्वत:च्या हिंमतीवर केला आहे. राजकीय नेतृत्व आपल्यासाठी काहीतरी करेल, अशा भ्रमात तो राहत नाही. आपल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो दबावगट तयार करतो व सरकारला त्यानुसार भूमिका घ्यायला भाग पाडतो. त्याची जगण्याची रीतही रोखठोक असते हे किंवा ते अशी ती आक्रमक असते. तो प्रेम करतानाही हातचे राखून काय करत नाही आणि विरोध करतानाही टोकाला जातो. कोण निवडून येणार यापेक्षा कोण निवडून येणार नाही याचे गणित त्यांने अगोदरच मनांत पक्के केलेले असते. कोल्हापूर हा विरोधी विचारांचा जिल्हा आहे असे म्हटले गेले. कारण राज्यात, केंद्रात जे सत्तेत आहेत, त्यांच्या नेमका जनमताचा उलटा कौल त्यांने अनेकदा दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शेकापक्षाचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसच्या प्रभावाखालीही होता. डाव्या पुरोगामी विचारांच्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत प्रथमच उजव्या विचारांना जनतेने यश दिले.

कोणत्या पक्षाचे कितीवेळा झाले खासदारकाँग्रेस : १०राष्ट्रवादी काँग्रेस : ०३अपक्ष : ०२शेतकरी कामगार पक्ष : ०२शेड्युल्ड कास्ट फेडरेशन : ०१शिवसेना : ०१(पहिल्या दोन निवडणुकीमध्ये द्विसदस्यीय पद्धती असल्याने सतरा निवडणुका आणि १९ खासदार झाले आहेत)

कुणाला कितीवेळा मिळाली खासदारकीउदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस) : ०५सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस व राष्ट्रवादी) : ०४

कोल्हापूरच्या माणसांत राजकीय प्रगल्भता आहे. राजकीय भूमिकेचा विचार तो सामाजिक भूमिकेला जोडून करतो. कोल्हापूरने एकदा भूमिका घेतली की त्याचे प्रतिबिंब राज्यात उमटते. तसे अन्य जिल्ह्यांच्या बाबतीत घडत नाही. - प्रा.विलास रणसुभे, राज्यशास्त्राचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूरPoliticsराजकारण