शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:36 IST

आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम, ठेकेदार, आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. दाखल गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेशही परिक्षेत्रातील पोलिस ठाण्यांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक फुलारी म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे अधिक आहेत. ही संख्या सुमारे १२०० इतकी आहेत. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम ठेेकेदारांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात वाढ आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये गुन्ह्यांची दाखल संख्या १७ हजार होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या १६ हजार ५०० इतकी आहे.मालमत्ताविषयक गुन्ह्यांत वाढ झाली आहे. जबरी चोरी ५८ टक्के, घरफोडी २७ टक्के आणि इतर चोरीचे प्रमाण २२ टक्के इतके आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिलअखेर खुनाचे २२ गुन्हे दाखल असून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांच्या तक्रारी थेट दाखल करून घेण्याचा उपक्रम प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरू आहे. त्यांचा तत्काळ छडा लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळत आहेत. त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने येत्या काही दिवसांत संयुक्तपणे कारवाई होईल.

बांगलादेशी नागरिक चौकशी सुरूकोल्हापुरात नागदेववाडी परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आक्षेपार्ह असलेले साहित्य जप्त केले आहे. त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि अन्य साहित्य सांगली येथून तयार केले आहे. त्यासंदर्भात आवश्यक ती सर्व चौकशी करण्याचे संबंधित तहसील कार्यालयाला दिले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले आहेत.

अतिजलद न्यायालयासाठी प्रयत्नसांगली येथील गर्भलिंग प्रकरणात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भपात प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. सरकारी वकिलांसोबत चर्चा करून प्रकरण अतिजलद न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस