शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 12:36 IST

आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम, ठेकेदार, आर्थिक फसवणुकीचे आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. दाखल गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेशही परिक्षेत्रातील पोलिस ठाण्यांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक फुलारी म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्याचा आलेख स्थिर आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे अधिक आहेत. ही संख्या सुमारे १२०० इतकी आहेत. ऊसतोड टोळ्यांतील मुकादम ठेेकेदारांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक फसवणुकीसह कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात वाढ आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये गुन्ह्यांची दाखल संख्या १७ हजार होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या १६ हजार ५०० इतकी आहे.मालमत्ताविषयक गुन्ह्यांत वाढ झाली आहे. जबरी चोरी ५८ टक्के, घरफोडी २७ टक्के आणि इतर चोरीचे प्रमाण २२ टक्के इतके आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिलअखेर खुनाचे २२ गुन्हे दाखल असून २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांच्या तक्रारी थेट दाखल करून घेण्याचा उपक्रम प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरू आहे. त्यांचा तत्काळ छडा लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळत आहेत. त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने येत्या काही दिवसांत संयुक्तपणे कारवाई होईल.

बांगलादेशी नागरिक चौकशी सुरूकोल्हापुरात नागदेववाडी परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आक्षेपार्ह असलेले साहित्य जप्त केले आहे. त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि अन्य साहित्य सांगली येथून तयार केले आहे. त्यासंदर्भात आवश्यक ती सर्व चौकशी करण्याचे संबंधित तहसील कार्यालयाला दिले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले आहेत.

अतिजलद न्यायालयासाठी प्रयत्नसांगली येथील गर्भलिंग प्रकरणात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भपात प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. सरकारी वकिलांसोबत चर्चा करून प्रकरण अतिजलद न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस