शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

By संदीप आडनाईक | Updated: June 22, 2024 13:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत अकरावीचा कटऑफ सरासरी दोन टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रवेशाचा कटऑफ सरासरी २ टक्के वाढला आहे.विवेकानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा यंदाचा कटऑफ ९२ टक्के इतका असून, गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी तो ९० टक्के होता. त्यापाठोपाठ न्यू कॉलेजचा कटऑफ ९१ टक्के इतका असून, गतवर्षी तो ८९ टक्के होता. राजाराम कॉलेजचा टक्का ९०.४० टक्के झाला असून, गतवर्षी तो ८८.४० टक्के होता. दरम्यान, वाणिज्य शाखेसाठी यंदा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात ९१ टक्के कटऑफ असून, गतवर्षी तो ८९.८० टक्के होता. त्यापाठोपाठ विवेकानंद कॉलेजचा कटऑफ ८६ टक्के इतका असून, तो गतवर्षी ८३ टक्के होता. डीडी शिंदे सरकार महाविद्यालयाचा कटऑफ ८३.४० टक्के इतका झाला असून गतवर्षी तो ८२.२० टक्के इतका होता.या पत्रकार परिषदेला शिक्षण निरीक्षक हेमंत बिराजदार, प्रवेश परीक्षा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. जे. आर. जोशी, प्रा. एम. एन. जाधव, प्रा. व्ही. बी. डोणे, प्रा. ए. एम. कोतवाल, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते.विज्ञान शाखेकडे कल वाढला दहावीच्या परीक्षेत मिळालेले भरघोस गुण, जादा संख्येने ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज आणि विज्ञान शाखेकडे वाढलेला विद्यार्थ्यांचा कल यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अकरावीसाठी प्रवेशांची संख्या वाढल्याने यंदाचा कट ऑफ वाढल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी सांगितले.यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या तुलनेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच लढा दिलेला दिसून येतो. वाणिज्य आणि कला शाखेला जाण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाखेत उत्तीर्ण विद्यार्थी व उपलब्ध जागांचे व्यस्त प्रमाण दिसत आहे.भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेचा मार्ग विद्यार्थ्यांनी चोखाळलेला आढळून येतो. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात क्षमता वाढवून देण्याचा पर्याय समितीकडे आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेउन यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा निवडण्यासाठी पालकांचा असलेला आग्रहही यामागे आहे. यंदाचा निकाल लक्षात घेतला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी