शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

By संदीप आडनाईक | Updated: June 22, 2024 13:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत अकरावीचा कटऑफ सरासरी दोन टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रवेशाचा कटऑफ सरासरी २ टक्के वाढला आहे.विवेकानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा यंदाचा कटऑफ ९२ टक्के इतका असून, गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी तो ९० टक्के होता. त्यापाठोपाठ न्यू कॉलेजचा कटऑफ ९१ टक्के इतका असून, गतवर्षी तो ८९ टक्के होता. राजाराम कॉलेजचा टक्का ९०.४० टक्के झाला असून, गतवर्षी तो ८८.४० टक्के होता. दरम्यान, वाणिज्य शाखेसाठी यंदा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात ९१ टक्के कटऑफ असून, गतवर्षी तो ८९.८० टक्के होता. त्यापाठोपाठ विवेकानंद कॉलेजचा कटऑफ ८६ टक्के इतका असून, तो गतवर्षी ८३ टक्के होता. डीडी शिंदे सरकार महाविद्यालयाचा कटऑफ ८३.४० टक्के इतका झाला असून गतवर्षी तो ८२.२० टक्के इतका होता.या पत्रकार परिषदेला शिक्षण निरीक्षक हेमंत बिराजदार, प्रवेश परीक्षा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. जे. आर. जोशी, प्रा. एम. एन. जाधव, प्रा. व्ही. बी. डोणे, प्रा. ए. एम. कोतवाल, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते.विज्ञान शाखेकडे कल वाढला दहावीच्या परीक्षेत मिळालेले भरघोस गुण, जादा संख्येने ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज आणि विज्ञान शाखेकडे वाढलेला विद्यार्थ्यांचा कल यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अकरावीसाठी प्रवेशांची संख्या वाढल्याने यंदाचा कट ऑफ वाढल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी सांगितले.यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या तुलनेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच लढा दिलेला दिसून येतो. वाणिज्य आणि कला शाखेला जाण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाखेत उत्तीर्ण विद्यार्थी व उपलब्ध जागांचे व्यस्त प्रमाण दिसत आहे.भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेचा मार्ग विद्यार्थ्यांनी चोखाळलेला आढळून येतो. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात क्षमता वाढवून देण्याचा पर्याय समितीकडे आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेउन यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा निवडण्यासाठी पालकांचा असलेला आग्रहही यामागे आहे. यंदाचा निकाल लक्षात घेतला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी