शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

By संदीप आडनाईक | Updated: June 22, 2024 13:34 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत अकरावीचा कटऑफ सरासरी दोन टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रवेशाचा कटऑफ सरासरी २ टक्के वाढला आहे.विवेकानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा यंदाचा कटऑफ ९२ टक्के इतका असून, गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी तो ९० टक्के होता. त्यापाठोपाठ न्यू कॉलेजचा कटऑफ ९१ टक्के इतका असून, गतवर्षी तो ८९ टक्के होता. राजाराम कॉलेजचा टक्का ९०.४० टक्के झाला असून, गतवर्षी तो ८८.४० टक्के होता. दरम्यान, वाणिज्य शाखेसाठी यंदा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात ९१ टक्के कटऑफ असून, गतवर्षी तो ८९.८० टक्के होता. त्यापाठोपाठ विवेकानंद कॉलेजचा कटऑफ ८६ टक्के इतका असून, तो गतवर्षी ८३ टक्के होता. डीडी शिंदे सरकार महाविद्यालयाचा कटऑफ ८३.४० टक्के इतका झाला असून गतवर्षी तो ८२.२० टक्के इतका होता.या पत्रकार परिषदेला शिक्षण निरीक्षक हेमंत बिराजदार, प्रवेश परीक्षा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. जे. आर. जोशी, प्रा. एम. एन. जाधव, प्रा. व्ही. बी. डोणे, प्रा. ए. एम. कोतवाल, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते.विज्ञान शाखेकडे कल वाढला दहावीच्या परीक्षेत मिळालेले भरघोस गुण, जादा संख्येने ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज आणि विज्ञान शाखेकडे वाढलेला विद्यार्थ्यांचा कल यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अकरावीसाठी प्रवेशांची संख्या वाढल्याने यंदाचा कट ऑफ वाढल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी सांगितले.यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या तुलनेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच लढा दिलेला दिसून येतो. वाणिज्य आणि कला शाखेला जाण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाखेत उत्तीर्ण विद्यार्थी व उपलब्ध जागांचे व्यस्त प्रमाण दिसत आहे.भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेचा मार्ग विद्यार्थ्यांनी चोखाळलेला आढळून येतो. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात क्षमता वाढवून देण्याचा पर्याय समितीकडे आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेउन यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा निवडण्यासाठी पालकांचा असलेला आग्रहही यामागे आहे. यंदाचा निकाल लक्षात घेतला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी