शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

‘एफआरपी’चे तुकडे शेतकऱ्यांसह विकास संस्थांच्या मुळावर, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 11:54 IST

वर्षाच्या आत पीक कर्जाची परतफेड करता न आल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज सवलतीपासून वंचित राहावे लागणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे दोन तुकडे पाडण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसह विकास संस्थांच्या मुळावर येणार आहे. वर्षाच्या आत पीक कर्जाची परतफेड करता न आल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांवर व्याजाचा बोजा वाढत जाऊन त्याची आर्थिक कोंडी होणार आहे. विकास संस्थांची थकबाकीही वाढणार आहे.साखर कारखान्याला ऊस पाठविल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेल्या साखरेची विक्री करून त्यातून सगळा खर्च भागविल्यानंतर राहिलेेले पैसे शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिले जायचे. शुगर ॲक्ट १९६६ नुसार शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची संपूर्ण रक्कम देणे बंधनकारक आहे.मात्र, उघडपणे कायद्याची पायमल्ली सुरू होती. राज्यातील शेतकरी जागरूक झाले आणि कायद्यानुसार एफआरपी देण्यास भाग पाडले. त्यानंतर खऱ्या अर्थाने ऊस उत्पादकांच्या जीवनात काहीसे स्थैर्य आले.मात्र, हे स्थैर्य टिकू द्यायचे नाही, यासाठी साखर कारखानदारांचा सातत्याने प्रयत्न राहिला. त्यातूनच ‘एसएमपी’चे रूपांतर ‘एफआरपी’मध्ये झाले. आता एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.जूनपर्यंत ऊस उत्पादकाचे आर्थिक वर्ष असते. जूनपर्यंत शंभर टक्के परतफेड केली तरच शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा होतो. मात्र, एफआरपीच्या तुकड्याने जूनपर्यंत परतावा करणे शक्यच होणार नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.

कारखानदारांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोरशेतकऱ्यांचे कैवारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत राजकारण केले. मात्र, एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या भूमिकेने याच नेत्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळेच साखर कारखानदार धार्जीण निर्णयाचा शेतकऱ्यांमधून निषेध होत आहे.

कायदा मोडण्याचा घाट अनेक दिवसांपासून

एकरकमी एफआरपीचा कायदा साखर सम्राट राज्यकर्त्यांना अडचणीचा ठरत होता. त्यामुळे तो मोडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. त्यात यश येत नाही म्हटल्यावर ऊस लागवडीचा करार करतानाच शेतकऱ्यांकडून दोन टप्प्यांत एफआरपी देण्याबाबत लिहून घेतले जाते. त्यालाही शेतकरी संघटनांनी विरोध सुरू केल्यानंतर थेट कायदाच बदलून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्याची भावना व्यक्त होत आहे.

कांडे लावल्यापासून दोन वर्षांनी पैसेआपल्याकडे जुलै, ऑगस्टमध्ये उसाची आडसाल लागवड केली जाते. या उसाची तोडणी अठरा महिन्यांनंतर होते. त्यानंतर महिनाभरात एकरकमी एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. मात्र, आता एफआरपीचे तुकडे पाडल्याने कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर दुसरा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये लावलेल्या उसाच्या कांड्याचे पैसे दोन वर्षांनी शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहेत.

ऊस उत्पादकांना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र आघाडी सरकारचे आहे. कायदा बदलण्याचा अधिकार राज्याला नसून याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे. - शिवाजीराव माने (जयशिवराय संघटना) 

एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी २३ मार्चला इस्लामपुरात मेळावा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. - रघुनाथदादा पाटील (नेते, शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने