शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
4
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
5
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
6
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
7
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
8
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
9
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
10
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
11
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
12
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
13
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
14
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
15
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
16
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
17
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
18
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
19
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
20
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापुरात घड्याळ्याचे काटे विस्कटले; मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान

By राजाराम लोंढे | Updated: November 26, 2024 16:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मरगळ झटकून बांधणी करण्याची गरज

राजाराम लोंढेकोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असून प्रत्येक पंचवार्षिकमध्ये आमदारांची संख्या घटत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा एकमेव आमदार असून पक्ष फुटीनंतर घड्याळ्याचे विस्कटलेले काट्याना योग्य दिशेवर आणून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे आव्हान मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर राहणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद मर्यादित आहे, सत्तेविना पक्ष मजबूत करण्याचे कसब जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना दाखवावे लागणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच काेल्हापूर जिल्ह्यात झाली, स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांत झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. पाच आमदार आणि दोन खासदार पक्षाचे विजयी झाले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांवर पक्षाचा झेंडा राहिला. पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत सुरक्षित जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. पण, २००९ नंतर पक्षाला गळती लागत गेली तर थांबली नाही.गेल्या दहा वर्षांत पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. खासदार सोडाच आमदारांची संख्या दोन वर आली. दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या फुटीनंतर मंत्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड यांच्यासह दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. पण, विधानसभेच्या तोंडावर के. पी. पाटील यांनी ‘मशाल’ हातात घेतली, तर ए. वाय. पाटील यांनी पक्षाला रामराम केले व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांनी उद्धवसेनेसोबत जाणे पसंत केल्याने पक्षाचे अस्तित्व ‘कागल’ व ‘चंदगड’ मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले.या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ हे निवडून आले. पण राजेश पाटील यांचा पराभव झाल्याने पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला. पक्षाच्या घड्याळ्याचे विस्कटलेले काटे योग्य दिशेवर आणून मजबुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरे जाण्याचे आव्हान मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर राहणार आहे.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत बांधणी केली असली तरी विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघासह इतर ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देऊन नव्याने बांधणी करावी लागणार आहे.

‘के. पीं’च्या हातावर पुन्हा ‘घड्याळ’?

राजकीय तडजोड म्हणून के. पी. पाटील यांनी हातात ‘मशाल’ घेतली असली तरी जिल्ह्यातील आगामी राजकारणात ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाबेतच राहण्याची शक्यता आहे.‘ए. वाय.’ यांना ‘कमळा’चा मोहविधानसभेतील पराभवानंतर ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी पुन्हा पक्षात यावे, यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत. पण, त्यांचा ‘कमळा’चा मोह पाहता, राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर आहे.

उमेदवार -  मतेराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

  • हसन मुश्रीफ (कागल) - १,४५,२६०
  • राजेश पाटील ( चंदगड) - ६०,१२०

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

  • समरजीत घाटगे (कागल) - १,३३,६८८
  • मदन कारंडे (इचलकरंजी) - ७५,१०८
  • नंदिनी बाभूळकर (चंदगड) - ४७,२५९
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024