शहरं
Join us  
Trending Stories
1
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
2
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
3
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
4
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
5
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
6
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
8
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
9
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
10
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
11
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
13
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
14
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
15
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
16
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
17
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
18
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
19
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
20
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
Daily Top 2Weekly Top 5

दहावी नापास होण्याच्या भीतीपोटी गेलो पळून : पुण्यातील हॉटेलमध्ये केले वेटरचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:19 IST

करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चुकलो, म्हणून वडिलांना मिठी मारली.

ठळक मुद्देसांगरूळच्या बेपत्ता दोघा मुलांची कबुली

एकनाथ पाटीलकोल्हापूर : दहावीचा अभ्यास होत नव्हता; नापास होण्याची भीती मनात होती; त्यामुळे आम्ही दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. कामधंदा करून पोट भरायचे, असे ठरवून आम्ही पळून गेलो. पुणे रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेलमध्ये सात दिवस वेटरचे काम केले, त्याच ठिकाणी राहिलो, अशी कबुली सांगरूळ (ता. करवीर) येथील बेपत्ता दोघा शाळकरी मुलांनी पोलिसांना दिली.

हृषिकेश कृष्णात नाळे व श्रेयस विजय पोवार खिशामध्ये एक रुपयाही नसताना दोघेजण १४ नोव्हेंबरला घराबाहेर पडले. सांगरूळमधून दुचाकीस्वारांकडे लिफ्ट मागून ते कोल्हापुरात आले. रंकाळा स्टॅँडवरून चालत रेल्वे स्टेशनवर आले. तेथून रात्री रेल्वेने ते पुण्यामध्ये आले. १५ नोव्हेंबरला पहाटे पुण्यामध्ये आल्यानंतर दोघेही भांबावून गेले. तो दिवस रेल्वे स्टेशनवरच उपाशीपोटी झोपून काढला. त्याच रात्री त्यांच्याजवळ असलेला मोबाईल चोरीला गेला. त्यामुळे दोघेही हतबल झाले. १६ नोव्हेंबरला सकाळी पोटाची भूक आवरेना म्हटल्यावर त्यांनी रेल्वे स्टेशनसमोर असलेले हॉटेल गाठले. येथील मालकाला ‘आम्हाला काम हवे आहे, कोल्हापूरहून आलो आहे,’ असे सांगून हृषिकेश नाळे याने आपले आधार कार्ड दाखविले; तर श्रेयस पोवार याने आपण अनाथ असल्याचे सांगितले. दोघांची अवस्था पाहून त्या हॉटेलमालकाने त्यांना वेटर म्हणून ठेवून घेतले.

दिवसभर काम करून ते हॉटेलमध्येच राहत होते. मालकाने किरकोळ खर्चासाठी ५०० रुपये दिले. त्याची त्यांनी बनियन आणि हाफ पॅँट खरेदी केली. जवळ पैसे नसल्याने ते पुढे कोठेच जाऊ शकत नव्हते. चार-पाच दिवस-रात्र मेहनत करून दोघेही थकले. हॉटेलमध्ये उत्तर प्रदेशमधील एक कामगार होता. त्याच्याशी मैत्री झाली. हृषिकेशला घरची ओढ लागू लागल्याने त्याने उत्तरप्रदेशच्या मित्राच्या मोबाईलवरून घरी नातेवाइकाच्या मोबाईलवर फोन करून पुण्यात असल्याचे सांगितले.

या दोघा शाळकरी मुलांची वर्दी करवीर पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. नातेवाइकाच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून पोलिसांनी पुण्यातील लोकेशन शोधून काढले. उजळाईवाडी महामार्ग पोलीस शाखेचे हवालदार तौसीफ मुल्ला, रामदास गायकवाड, राहुल देसाई, बबन शिंदे, शहाजी पाटील, भरत कांबळे हे लोणावळा महामार्गावर १५ दिवस बंदोबस्ताला होते. त्यांच्याशी या मुलांचा शोध घेण्यासाठी संपर्क साधला होता. तौसीफ मुल्ला यांनी मोबाईल लोकेशन मिळवून थेट हॉटेल गाठले. याबाबत पूर्णत: गोपनीयता पाळली होती. मुलांना थोडीजरी चाहूल लागली तर तेथून ती पळून जातील, या भीतीपोटी त्या उत्तरप्रदेशच्या कामगाराच्या मोबाईलवर संपर्क साधला नव्हता.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर हृषिकेश व श्रेयस वेटरचे काम करताना दिसून आले. मुल्ला यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघेही बिथरून गेले. त्यांना धीर देत हॉटेलमालकाला वस्तुस्थिती सांगून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुल्ला यांनी स्वखर्चाने त्यांना पुण्याहून कोल्हापूरला आणले. करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चुकलो, म्हणून वडिलांना मिठी मारली.

पंधरा दिवसांची ओळख.....श्रेयस पोवार हा दहावी नापास होता. त्याने पुन्हा फॉर्म भरला होता; परंतु अभ्यास होत नव्हता. तो सांगरूळ येथील मामाकडे १५ दिवसांपूर्वी राहण्यासाठी आला होता. याचवेळी त्याची हृषिकेशची ओळख झाली. तो दहावीमध्ये असल्याने दोघांनाही नापास होण्याची भीती होती. परीक्षेनंतर घरचे ओरडतील, त्यापूर्वीच पळून गेलेले बरे, असे ठरवून दोघेही अंगावरील कपड्यांवर घराबाहेर पडले होते. आपली चूक त्यांच्या लक्षात आली होती. दोघेही करवीर पोलीस ठाण्यात बिथरूनच होते. पालक मात्र त्यांना धीर देत होते. 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी