शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दहावी नापास होण्याच्या भीतीपोटी गेलो पळून : पुण्यातील हॉटेलमध्ये केले वेटरचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:19 IST

करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चुकलो, म्हणून वडिलांना मिठी मारली.

ठळक मुद्देसांगरूळच्या बेपत्ता दोघा मुलांची कबुली

एकनाथ पाटीलकोल्हापूर : दहावीचा अभ्यास होत नव्हता; नापास होण्याची भीती मनात होती; त्यामुळे आम्ही दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. कामधंदा करून पोट भरायचे, असे ठरवून आम्ही पळून गेलो. पुणे रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेलमध्ये सात दिवस वेटरचे काम केले, त्याच ठिकाणी राहिलो, अशी कबुली सांगरूळ (ता. करवीर) येथील बेपत्ता दोघा शाळकरी मुलांनी पोलिसांना दिली.

हृषिकेश कृष्णात नाळे व श्रेयस विजय पोवार खिशामध्ये एक रुपयाही नसताना दोघेजण १४ नोव्हेंबरला घराबाहेर पडले. सांगरूळमधून दुचाकीस्वारांकडे लिफ्ट मागून ते कोल्हापुरात आले. रंकाळा स्टॅँडवरून चालत रेल्वे स्टेशनवर आले. तेथून रात्री रेल्वेने ते पुण्यामध्ये आले. १५ नोव्हेंबरला पहाटे पुण्यामध्ये आल्यानंतर दोघेही भांबावून गेले. तो दिवस रेल्वे स्टेशनवरच उपाशीपोटी झोपून काढला. त्याच रात्री त्यांच्याजवळ असलेला मोबाईल चोरीला गेला. त्यामुळे दोघेही हतबल झाले. १६ नोव्हेंबरला सकाळी पोटाची भूक आवरेना म्हटल्यावर त्यांनी रेल्वे स्टेशनसमोर असलेले हॉटेल गाठले. येथील मालकाला ‘आम्हाला काम हवे आहे, कोल्हापूरहून आलो आहे,’ असे सांगून हृषिकेश नाळे याने आपले आधार कार्ड दाखविले; तर श्रेयस पोवार याने आपण अनाथ असल्याचे सांगितले. दोघांची अवस्था पाहून त्या हॉटेलमालकाने त्यांना वेटर म्हणून ठेवून घेतले.

दिवसभर काम करून ते हॉटेलमध्येच राहत होते. मालकाने किरकोळ खर्चासाठी ५०० रुपये दिले. त्याची त्यांनी बनियन आणि हाफ पॅँट खरेदी केली. जवळ पैसे नसल्याने ते पुढे कोठेच जाऊ शकत नव्हते. चार-पाच दिवस-रात्र मेहनत करून दोघेही थकले. हॉटेलमध्ये उत्तर प्रदेशमधील एक कामगार होता. त्याच्याशी मैत्री झाली. हृषिकेशला घरची ओढ लागू लागल्याने त्याने उत्तरप्रदेशच्या मित्राच्या मोबाईलवरून घरी नातेवाइकाच्या मोबाईलवर फोन करून पुण्यात असल्याचे सांगितले.

या दोघा शाळकरी मुलांची वर्दी करवीर पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. नातेवाइकाच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून पोलिसांनी पुण्यातील लोकेशन शोधून काढले. उजळाईवाडी महामार्ग पोलीस शाखेचे हवालदार तौसीफ मुल्ला, रामदास गायकवाड, राहुल देसाई, बबन शिंदे, शहाजी पाटील, भरत कांबळे हे लोणावळा महामार्गावर १५ दिवस बंदोबस्ताला होते. त्यांच्याशी या मुलांचा शोध घेण्यासाठी संपर्क साधला होता. तौसीफ मुल्ला यांनी मोबाईल लोकेशन मिळवून थेट हॉटेल गाठले. याबाबत पूर्णत: गोपनीयता पाळली होती. मुलांना थोडीजरी चाहूल लागली तर तेथून ती पळून जातील, या भीतीपोटी त्या उत्तरप्रदेशच्या कामगाराच्या मोबाईलवर संपर्क साधला नव्हता.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर हृषिकेश व श्रेयस वेटरचे काम करताना दिसून आले. मुल्ला यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघेही बिथरून गेले. त्यांना धीर देत हॉटेलमालकाला वस्तुस्थिती सांगून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुल्ला यांनी स्वखर्चाने त्यांना पुण्याहून कोल्हापूरला आणले. करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चुकलो, म्हणून वडिलांना मिठी मारली.

पंधरा दिवसांची ओळख.....श्रेयस पोवार हा दहावी नापास होता. त्याने पुन्हा फॉर्म भरला होता; परंतु अभ्यास होत नव्हता. तो सांगरूळ येथील मामाकडे १५ दिवसांपूर्वी राहण्यासाठी आला होता. याचवेळी त्याची हृषिकेशची ओळख झाली. तो दहावीमध्ये असल्याने दोघांनाही नापास होण्याची भीती होती. परीक्षेनंतर घरचे ओरडतील, त्यापूर्वीच पळून गेलेले बरे, असे ठरवून दोघेही अंगावरील कपड्यांवर घराबाहेर पडले होते. आपली चूक त्यांच्या लक्षात आली होती. दोघेही करवीर पोलीस ठाण्यात बिथरूनच होते. पालक मात्र त्यांना धीर देत होते. 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी