शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली तलाव पुनर्बांधणीची जानेवारीपर्यंत निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा ...

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा अभ्यास पाटबंधारे विभागातील तज्ज्ञाची समिती करीत आहे. त्यांचा निष्कर्ष येण्यास दोन ते तीन महिने लागतील. तोपर्यंत तलावाची पुनर्बांधणी करण्यासाठीची जानेवारीपर्यंत निविदा निघेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली.

भेटीवेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते. ते म्हणाले, मेघोली तलाव फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वत: जाऊन पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वाहून गेलेल्या विहिरीची खोदाई करता येईल. यासाठी प्रशासन मदत करेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज भरण्यास मुदत दिली जाईल.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, तलाव फुटण्यास कोण जबाबदार याची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर जबाबदारी निश्चित करावी. तलावफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. शिवाय सरकारकडून त्यांना भरीव मदत मिळायला हवी. तलावाची पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करावा.

या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, अतुल गुरव, कुंडलिक देसाई, शिवाजी पाटील, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.

चौकट

तलाव दिवसा फुटला असता तर

मेघोली तलावाच्या खालील बाजूस शेतीच्या मशागतीसाठी अनेक शेतकरी असत. दिवसा तलाव फुटला असता तर मशागतीचे काम करणारे शेतकरी, मजूर असे शंभरावर लोक वाहून गेले असते. पाटबंधारे विभागाने गळतीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना झाल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.