शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘ताई-माई’मुळे भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

By admin | Updated: July 3, 2015 00:43 IST

भाई जगताप : गेल्या सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कोपार्डे : ‘अच्छे दिन’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारमधील ‘ताई-माई’च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना ऊत आला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच शेतकऱ्यांचे तारणहार असून, कॉँग्रेस सत्तेत असताना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्राने ७२ हजार, तर राज्यातील अशोक चव्हाण यांच्या सरकारने सहा हजार २०० कोटी दिले. मात्र, आता भूमिअधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला.यवलूज (ता. पन्हाळा) येथे नागरिका स्पिनिंग मिल येथील कर्मचारी व प्रशासनामधील वाद मिटविण्यासाठी ते मुंबईहून आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर ताशेरे ओढले.जगताप म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत असल्याने चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी पैसा नाही, अशावेळी शेती कर्जाचे पुणर्गठण करायला निघाले आहे. हा प्रकार पुन्हा शेतकऱ्यांचीमान कर्जाच्या कचाट्यात घालण्याचा हा प्रकार आहे. भाजप सरकारच्या काळात केवळ सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्या भाजपने शेतकऱ्यांच्या कॉँग्रेसच्या कार्यकाळातील आत्महत्येचे भांडवल केले ते आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.भूमिअधिग्रहणाचा १८९४ चा कायदा अंमलात आणण्यासाठी ११२ वर्षे लागली. मात्र, सुषमा स्वराज व अरुण जेटली या सरकारच्या वकील जोडगळीने तो एका वर्षात अंमलात आणण्यास घाई करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप केला.