शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर ...

कळंबा : एप्रिलच्या मध्यावर कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीपातळी तेरा फुटांवर आली असून, तलावपात्रातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कळंबा परिसरातील पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

तलावातील जैवविविधता कायम राहावी यासाठी किमान दहा फूट मृत पाणीसाठा शिल्लक ठेवावा लागणार असल्याने मे महिन्यात पाणी प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत. यंदा एप्रिल महिन्यात तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने पाणी बाष्पीभवनाचा वेग वाढला. त्यात प्रतिवर्षी पाणीवाटपाचे नियोजन करण्यात पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता पावसाळ्यापूर्वीच जाणवत असल्याचे चित्र आहे. कळंबा, पाचगावमधील नागरिकांची पाण्याची गरज भागवत जनावरांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनास पडला आहे.

ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न जटिल बनणार, हे लक्षात येताच कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिका पाणीपुरवठा विभागास तलावातून कमी पाणीउपसा करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

चौकट : प्रशासनाची तारेवरची कसरत

पाणीटंचाईचा विचार करता उपलब्ध पाणीसाठ्यातून उपनगरांची गरज भागवतानाच पालिका प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागते.

आजमितीला कळंबा ग्रामपंचायत दररोज एक एमएलडी, तर पालिका पाणीपुरवठा विभाग बी वॉर्डला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज सहा एमएलडी पाणीउपसा करते. सध्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी केवळ तीन फूट पाणीउपसा करता येणे शक्य असल्याने ऐन मे महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

चौकट: शाहूकालीन विहीर गाळात

ऐन उन्हाळ्यात तलावातील पाणीसाठा कमी झाल्यास पाणीटंचाई भासू नये यासाठी तलाव पात्रात चाळीस फूट रुंद व साठ फूट खोल विहीर काढली होती. ऐन पाणीटंचाई काळात ती उपयुक्त ठरते; पण प्रदूषण व गाळात विहिरीचे अस्तित्व हरवले आहे. दरम्यान, भविष्यात पाणीटंचाईची भीषणता विचारात घेऊन पुणे पालिकेने बांधकाम परवान्यासोबत रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. शिवाय एक दिवस आड पाणीपुरवठा कायम ठेवल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले आहे. पुणे पालिकेचा हा पॅटर्न कोल्हापूर महापालिकेनेही राबविण्याची गरज आहे.

फोटो: १७ कळंबा तलाव

ओळ

ऐन एप्रिल महिन्यात कळंबा तलावाची पाणीपातळी अवघी तेरा फुटांवर येऊन पोहोचल्याने मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.