शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:52 AM

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकार फक्त आपणच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत चालढकल करते असे ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकार फक्त आपणच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत चालढकल करते असे नसून चक्क सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचीही सरकारकडून फिकीर बाळगली जात नसल्याचे चित्र शासनानेच सोमवारी काढलेल्या एका आदेशान्वये पुढे आले आहे.न्यायालयाने लेखापरीक्षकांचे कपात करून घेतलेले व देय असणारे २० टक्के लेखापरीक्षण शुल्क चार आठवड्यांत द्यावे, असे आदेश १३ जुलै २०१७ ला दिले होते, ही तब्बल ३६ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम संबंधितांना अदा करावी, असे आदेश सहकार विभागाने सोमवारीकाढले.घडले ते असे : सहकार आयुक्तांनी दि. ४ जून १९९२ च्या एका परिपत्रकान्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांना देय असणाऱ्या लेखापरीक्षण शुल्कातून २० टक्के रक्कम प्रशासकीय शुल्कापोटी वसूल करून शासनाकडे भरणा करण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. या परिपत्रकास महाराष्ट्र सर्टिफाईडस आॅडिटर्स असोसिएशन व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दि. १४ आॅक्टोबर २००४ला दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सन २००५ मध्ये तीन याचिका दाखल झाल्या. या याचिकांचे सन २०१३ मध्ये सिव्हील अपिलमध्ये रूपांतर झाले. त्यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने दि. १३ जुलै २०१७ ला हे शुल्क चार आठवड्यांच्या आत संबंधित लेखापरीक्षकांस परत करावे, असे आदेश दिले. त्यानंतर सरकारच्या सहकार खात्याच्या पातळीवर यंत्रणा जागी झाली व प्रत्यक्ष पैसे देण्याचे आदेश काढण्यास तब्बल १६ महिने गेले. ही ३६ लाख ५४ हजार इतकी रक्कम आहे. ही रक्कम सरकारच्या मालकीची नव्हे. ती लेखापरीक्षकांच्या कामाचा मोबदला आहे. ती सन २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली. ही रक्कम बीम्सद्वारे वितरित करण्यात संमती देण्यात आली आहे.या जिल्ह्यांना रक्कम मिळणारकोल्हापूर (नऊ लाख), सांगली (१ लाख ७९ हजार), सातारा (२ लाख) यांच्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्णांतील लेखापरीक्षकांना ही रक्कम मिळणार आहे.