शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:16 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची उसनवारी करून ऊस पिक जगवण्यासाठी धडपडत आहेत. आजूबाजूच्या गावात वळीव पाऊस झाला असला तरी उत्तूरला वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस  झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले. विहिरी व कुपनलिकेचे अपुरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर ऊस पिक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊसकरी शेतकरी त्रस्त झाले आहेत. चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्रपाळी असा शेतीसाठीचा वीजपुरवठा असल्याने ऊसाला पाणी देण्यात देखील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. कुपनलिकेतील पाण्याची पातळीही उष्णतेने खाली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडेल याकडे डोळे लावून बसले आहेत. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. काही वेळेला विजांचा कडकडाट होतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. परिणामी यावर्षी उत्तूर  परिसरातील ऊस उत्पादन घटल्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढलेल्या उष्णतेमुळे ऊस पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. वळीव पाऊस नसल्याने उसाने काही ठिकाणी मान टाकली आहे. शेजारच्या उपनलिकेचे पाणी उसणवारीने घेऊन पीक जगवण्याची धडपड सुरू आहे. - सुरेश कुंभार- शेतकरी 

आजरा, गडहिंग्लज व गारगोटी अशा उत्तुरच्या सभोवतीच्या गावात वळीव पाऊस झाला. मात्र उत्तुरला अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस पिक वाचवणे जिकरीचे झाले आहे. अजूनही पावसाला दीड दोन महिने असल्याने ऊस पीकासाठी पाणी कुठून आणणार अशी अडचण आहे. - आयेशा ढालाईत  - शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी