शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Kolhapur: उत्तूरमधील ऊस पिके करपली, शेतकरी चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:16 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर: उन्हाळ्यात दरवर्षी पडणारा वळीव पाऊस उत्तूरला अजूनही न पडल्याने ऊस पिके करपू लागली आहेत. शेतकरी पाण्याची उसनवारी करून ऊस पिक जगवण्यासाठी धडपडत आहेत. आजूबाजूच्या गावात वळीव पाऊस झाला असला तरी उत्तूरला वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस  झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले. विहिरी व कुपनलिकेचे अपुरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर ऊस पिक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊसकरी शेतकरी त्रस्त झाले आहेत. चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्रपाळी असा शेतीसाठीचा वीजपुरवठा असल्याने ऊसाला पाणी देण्यात देखील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. कुपनलिकेतील पाण्याची पातळीही उष्णतेने खाली जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडेल याकडे डोळे लावून बसले आहेत. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. काही वेळेला विजांचा कडकडाट होतो. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. परिणामी यावर्षी उत्तूर  परिसरातील ऊस उत्पादन घटल्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

सूर्यकिरणांची तीव्रता वाढलेल्या उष्णतेमुळे ऊस पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. वळीव पाऊस नसल्याने उसाने काही ठिकाणी मान टाकली आहे. शेजारच्या उपनलिकेचे पाणी उसणवारीने घेऊन पीक जगवण्याची धडपड सुरू आहे. - सुरेश कुंभार- शेतकरी 

आजरा, गडहिंग्लज व गारगोटी अशा उत्तुरच्या सभोवतीच्या गावात वळीव पाऊस झाला. मात्र उत्तुरला अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस पिक वाचवणे जिकरीचे झाले आहे. अजूनही पावसाला दीड दोन महिने असल्याने ऊस पीकासाठी पाणी कुठून आणणार अशी अडचण आहे. - आयेशा ढालाईत  - शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी