शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

भूतदयेसाठी भारत भ्रमण करणारा सुफी

By admin | Updated: July 12, 2015 21:23 IST

सात हजार कि.मी.चा प्रवास : ग्रामस्थ भारावले

रामचंद्र कुडाळकर - तळवडे --आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांनाच प्रगती करण्याची व त्यातही पुढे जाण्याची घाई लागली आहे. पण एकेकाळी आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या आणि काही प्रमाणात उदरनिर्वाहाचेही साधन ठरलेल्या पाळीव प्राण्यांचे मात्र या युगात पाहिजे तसे पालन होताना दिसत नाही. म्हणूनच आज गावोगावी भटकी कुत्री, मांजर, गायी, म्हशी असे प्राणी आढळतात. याच प्राण्यांच्या पालनपोषणाचे आवाहन करण्यासाठी जम्मू-काश्मीरहून भारतभ्रमण करणाऱ्या एका व्यक्तीचे कार्य सावंतवाडी तालुक्यातील तळवडे पंचक्रोशीत कौतुकास्पद ठरले. भूतदयेचा संदेश देणाऱ्या या अवलियाला पाहून ग्रामस्थ काही काळ भावनिक झाले. या ४३ वर्षीय व्यक्तीचे नाव सुफी अल्ताफ भाट असे असून, आतापर्यंत त्याने सात हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. २६ सप्टेंबर २०१० पासून त्याने जम्मू-काश्मीर ते मुंबई, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली व गोवापर्यंतचा प्रवास केला. आता तो मुंबईकडे मार्गक्रमण करीत आहे. वाटेत भेटेल त्याला शांतीमय जीवनाचा व सहनशीलतेचा संदेश देत विनम्रपणे जाणारा हा अवलिया भूतदयेसाठी आदर्शवत ठरला आहे. गावोगावी फिरणारी भटकी कुत्री, जनावरे यांच्या नसबंदीअभावी वाढणारी संख्या समाजास घातक ठरतेच, पण त्याचबरोबर त्या प्राणिमात्रांचे पालनपोषणही अडचणीचे ठरते. प्लास्टिकचा कचरा रस्तोरस्ती पडत आहे. भटकणारे प्राणी हा कचरा खाऊन अनेक आजारांना बळी पडतात. प्राणी लहान मुलांवर हल्ला करतात. त्यामुळे रॅबीज लस द्यावी लागते. या प्राण्यांवर योग्य व आवश्यक उपचार केला जात नसल्याने साहजिकच प्राण्यांचे हे रोग वातावरणाद्वारे मानवाच्या आरोग्यालाही घातक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भटकणाऱ्या प्राण्यांना आपलेसे करून त्यांचे पालनपोषण केले तर भूतदयाही होईलच, पण त्याचबरोबर मोठे सामाजिक कामही त्यांच्या हातून घडेल, असे भावनिक विवेचन सुफी भाट ग्रामस्थांशी करतो. यामुळे ग्रामस्थही भावनिक होऊन धीरगंभीर होतात. सुुफीकडे त्याच्या भटकंतीवेळी सापडलेली दोन कुत्री व एक मांजर आहे. त्यांची तो नित्यनियमाने सेवा करतो. खिशात आवश्यक तेवढा पैसा आणि पाठीशी हवे तेवढे पाठबळ नसताना सुफीची ही वाट म्हणजे समाजाला भूतदयेचा आदर्शवत मार्ग दर्शविणारी आहे. गोवा राज्याची सफर केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्ह्यातील मळगाव येथील महामार्गावर पायी जाणाऱ्या सुफी भाट याच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावेळी त्याने जगाच्या नकाशावरील भारतातील पर्यटनाचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून गौरविले जाणारे गोवा राज्य हे आपल्या भटकंतीच्या मुख्य उद्देशाला फायदेशीर ठरणार असल्याने आपण इकडे आल्याचे सांगितले.