शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘संघर्ष’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी

By admin | Updated: September 7, 2015 00:52 IST

‘युवा शक्ती’तर्फे आयोजन : गडहिंग्लजकरांनी सात थर लावत दुसऱ्यांदा पटकावले बक्षीस; सव्वातीन तास थरार

कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)१०० ट्रक चारा देणार : महाडिकराज्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून पाणी, चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यापूर्वीही दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीवेळी वेळी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले आहे. तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाची झळ कमी आहे. त्यामुळे अन्य दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक चारा संकलित करून पाठविणार आहे. खासदार म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. अनेक प्रश्नांची तड लावली आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. बालगोविंदांसाठी विशेष दक्षतादहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात बालगोविंदा जखमी होऊ नयेत, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली होती. सर्वांत उंचावर असलेल्या एका बालगोविंदाला विशेष रोप लावण्यात येत होता. ही सुविधा हिलरायडर्स ग्रुपने पुरविली. मानवी मनोरा रचताना पडून जखमी झालेल्या चार गोविंदांना सीपीआर व सिद्धगिरी रुग्णालयांतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.