शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

पोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:00 IST

सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!विश्रांती कमी मिळत असल्यानेही आरोग्यावर परिणाम

शरद जाधव सांगली : सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचेआरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यातील पोलीस दल थोडा वेळ सोडला, तर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या बंदोबस्तावर तैनात आहेच. एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणूक, त्यानंतर थोड्याच कालावधित महापूर, लगोलग विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस सलग पोलीस बंदोबस्तात कायम आहेत. ऊन, पावसाची तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे.या सलगच्या ड्युटीमुळेच पोलिसांना हृदयविकाराचा मोठा त्रास जाणवत आहे. अनेकवेळा बंदोबस्तासाठी तास न् तास उभे राहावे लागत असल्याने, पायाला सूज, टाचा दुखण्यासह मणक्याचेही विकार जडले आहेत. त्यातच रात्री-अपरात्रीच्या ड्युटीमुळे विश्रांती कमी मिळत असल्यानेही पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.पोलीस दलातील नवीन कर्मचारी व अधिकारी आपल्या आरोग्याबाबत सजग असले तरी, सेवेत काही वर्षे रुळलेल्या कर्मचाऱ्यांना कामाचा वाढता ताण व अन्य कारणामुळे व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांसाठी परेडसह इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, वाढत्या कामामुळे त्यात कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याचे चित्र आहे.

आरोग्य चांगले राहावे व त्यांना आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी पोलीस दलातर्फे आरोग्य शिबिरांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात येते. मात्र, केवळ मार्गदर्शनाने थोड्या कालावधीकरिता कर्मचाऱ्यांत सजगता निर्माण होत असली तरी, त्यानंतर ती सजगता कायम राहत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीHealthआरोग्य