शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
2
वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद
3
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
4
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
5
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
6
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
7
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
8
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
9
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

सामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 3:10 PM

जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसामाजिक असमानता दूर करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी हवी : आर. इंदिराशिवाजी विद्यापीठातील संगवे स्मृती व्याख्यान

कोल्हापूर : जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; तरच गरिबी, सामाजिक असमानता दूर होईल, असे मत इंडियन सोशिआॅलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. आर. इंदिरा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ प्रा. डॉ. उत्तमराव भोईटे होते. प्रा. इंदिरा यांच्या व्याख्यानाचा विषय ‘भारतातील गरिबी, सामाजिक असमानता आणि अन्याय’ असा होता.

प्रा. इंदिरा म्हणाल्या, जागतिकीकरणाच्या घुसळणीत होणारी फरफट, तंत्रज्ञानामुळे आलेल्या भौतिक सुविधांमागे धावण्याची प्रवृत्ती आणि यासाठी राबविण्यात येणारी धोरणे यांमुळे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत गेले. जागतिकीकरणामुळे समाजाचा मानवी चेहराच हरवला आहे. या प्रक्रियेत श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत, तर गरीब खोल गर्तेत ढकलला जात आहे. मानवी समाजाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे.या कार्यक्रमास माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पवार, आर. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर