शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

कोल्हापूर : येत्या अधिवेशनात राज्य सरकार कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारीत करणार असल्याचे समजते. असे न करता ...

कोल्हापूर : येत्या अधिवेशनात राज्य सरकार कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारीत करणार असल्याचे समजते. असे न करता सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करूनच सुधारणेचा निर्णय घ्यावा. सरकारने घाईत कृषी विधेयकातील सुधारणांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईत भेट घेऊन केली.

राज्यातील शेती आणि शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. दिवसागणित शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. यामुळे खते, बियाणे, कीटकनाशके रास्त भावात मिळाव्यात. सिंचन सुविधा वाढवावे, शेतीसाठीची वीज पुरेशा दाबाने योग्य भावात मिळावी, कमी व्याज दरातील शेतीसाठीच्या कर्जाची मर्यादा वाढवावी, शेतमाल साठवणुकीसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी, स्वामिनाथन समिती शिफारशीप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा असा हमीभाव मिळण्याची यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आल्या.

केंद्रांनी २०२० मध्ये आणलेले नवीन कायदे, सुधारणा शेतकऱ्यांना मारकच आहेत. हमीभाव राहणार असे मोघमपणे केंद्र सरकार सांगत असले तरी व्यापारी, मोठ्या कंपन्या यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा उल्लेख नवीन कृषी कायद्यात नाही. म्हणून येत्या अधिवेशनात शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी केंद्रीय कायद्यांना विरोध करणारा स्पष्ट ठराव करावा, असे सुचवण्यात आले.

या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक नेत्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, एस. व्ही. जाधव आदी उपस्थित होते.

फोटो : २९०६२०२१-कोल राजू शेट्टी भेट

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.