शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:58 IST

सहा गावांसह बालिंगा, पाडळीच्या विस्तारित भागाचा समावेश होणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना सोबत घेऊन नवीन प्रस्ताव तयार करण्यासह हद्दवाढीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निर्णय घेण्यास काही अडचणी येऊ शकतील का, याबाबत निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे गेली ५३ वर्षे रखडलेली हद्दवाढ होण्याची शक्यता ठळक झाली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा सूचना देऊन हद्दवाढीचा चेंडू पुन्हा एकदा महापालिकेच्या जाळ्यात टाकला आहे. त्यांच्या सूचनेमुळे हद्दवाढीचा आणखी एक नवीन प्रस्ताव राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे. हद्दवाढ तातडीने होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार याची उत्सुकता वाढली आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटले. हद्दवाढीला पहिल्यापासून विरोध करणारे आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. त्यांनीच शिष्टमंडळासोबत जाण्याचे टाळले.विकासाच्या दृष्टीने शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणूनच शहराची गरज ओळखून हद्दवाढ करावी, असे आवाहन शिष्टमंडळाकडून करण्यात आले. अठरा गावे घेण्याऐवजी शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना शहरात घेतले जावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.त्यावेळी उपस्थित असलेल्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (क्रमांक १) गोविंदराज व प्रधान सचिव (क्रमांक २) असीम गुप्ता यांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, आठ गावांना घेऊन हद्दवाढ करता येईल का? याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांची दिली.शिष्टमंडळाने आधी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, असा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनीही त्यास सहमती दिली.

आता पुढे काय होणार?मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश क्षीरसागर हे महापालिका प्रशासकांना आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी करणार आहेत. त्यानंतर प्रशासक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अभिप्राय घेतील. त्यानंतर नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

या गावांचा होणार समावेश..शहराशी एकरुप झालेले पाचगाव, कळंबा, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी ही सहा पूर्ण गावे; तसेच बालिंगा व पाडळी खुर्द या दोन गावांचे मूळ गावठाण सोडून कोल्हापूर शहराला जोडलेला विस्तारित भाग यांना नवीन प्रस्तावात समावेश राहणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, तसेच त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय हद्दवाढ केली जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ग्रामीण भागातील जी भूमिका आहे तीच आमचीही आहे. त्यामुळे आमचीही मते जाणून घ्यावीत, मगच निर्णय घेतला जावा. - आमदार चंद्रदीप नरकेग्रामीण जनता आमची दुष्मन नाही; पण शहराच्या विकासाचा विचार करता हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणून ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेचा विषय न करता सामोपचाराने मार्ग काढण्यास पुढे आले पाहिजे. - आमदार राजेश क्षीरसागर