शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:58 IST

सहा गावांसह बालिंगा, पाडळीच्या विस्तारित भागाचा समावेश होणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना सोबत घेऊन नवीन प्रस्ताव तयार करण्यासह हद्दवाढीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निर्णय घेण्यास काही अडचणी येऊ शकतील का, याबाबत निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे गेली ५३ वर्षे रखडलेली हद्दवाढ होण्याची शक्यता ठळक झाली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा सूचना देऊन हद्दवाढीचा चेंडू पुन्हा एकदा महापालिकेच्या जाळ्यात टाकला आहे. त्यांच्या सूचनेमुळे हद्दवाढीचा आणखी एक नवीन प्रस्ताव राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे. हद्दवाढ तातडीने होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार याची उत्सुकता वाढली आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटले. हद्दवाढीला पहिल्यापासून विरोध करणारे आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. त्यांनीच शिष्टमंडळासोबत जाण्याचे टाळले.विकासाच्या दृष्टीने शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणूनच शहराची गरज ओळखून हद्दवाढ करावी, असे आवाहन शिष्टमंडळाकडून करण्यात आले. अठरा गावे घेण्याऐवजी शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना शहरात घेतले जावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.त्यावेळी उपस्थित असलेल्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (क्रमांक १) गोविंदराज व प्रधान सचिव (क्रमांक २) असीम गुप्ता यांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, आठ गावांना घेऊन हद्दवाढ करता येईल का? याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांची दिली.शिष्टमंडळाने आधी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, असा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनीही त्यास सहमती दिली.

आता पुढे काय होणार?मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश क्षीरसागर हे महापालिका प्रशासकांना आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी करणार आहेत. त्यानंतर प्रशासक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अभिप्राय घेतील. त्यानंतर नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

या गावांचा होणार समावेश..शहराशी एकरुप झालेले पाचगाव, कळंबा, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी ही सहा पूर्ण गावे; तसेच बालिंगा व पाडळी खुर्द या दोन गावांचे मूळ गावठाण सोडून कोल्हापूर शहराला जोडलेला विस्तारित भाग यांना नवीन प्रस्तावात समावेश राहणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, तसेच त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय हद्दवाढ केली जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ग्रामीण भागातील जी भूमिका आहे तीच आमचीही आहे. त्यामुळे आमचीही मते जाणून घ्यावीत, मगच निर्णय घेतला जावा. - आमदार चंद्रदीप नरकेग्रामीण जनता आमची दुष्मन नाही; पण शहराच्या विकासाचा विचार करता हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणून ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेचा विषय न करता सामोपचाराने मार्ग काढण्यास पुढे आले पाहिजे. - आमदार राजेश क्षीरसागर