शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:58 IST

सहा गावांसह बालिंगा, पाडळीच्या विस्तारित भागाचा समावेश होणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना सोबत घेऊन नवीन प्रस्ताव तयार करण्यासह हद्दवाढीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निर्णय घेण्यास काही अडचणी येऊ शकतील का, याबाबत निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे गेली ५३ वर्षे रखडलेली हद्दवाढ होण्याची शक्यता ठळक झाली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा सूचना देऊन हद्दवाढीचा चेंडू पुन्हा एकदा महापालिकेच्या जाळ्यात टाकला आहे. त्यांच्या सूचनेमुळे हद्दवाढीचा आणखी एक नवीन प्रस्ताव राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे. हद्दवाढ तातडीने होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार याची उत्सुकता वाढली आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटले. हद्दवाढीला पहिल्यापासून विरोध करणारे आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. त्यांनीच शिष्टमंडळासोबत जाण्याचे टाळले.विकासाच्या दृष्टीने शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणूनच शहराची गरज ओळखून हद्दवाढ करावी, असे आवाहन शिष्टमंडळाकडून करण्यात आले. अठरा गावे घेण्याऐवजी शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना शहरात घेतले जावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.त्यावेळी उपस्थित असलेल्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (क्रमांक १) गोविंदराज व प्रधान सचिव (क्रमांक २) असीम गुप्ता यांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, आठ गावांना घेऊन हद्दवाढ करता येईल का? याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांची दिली.शिष्टमंडळाने आधी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, असा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनीही त्यास सहमती दिली.

आता पुढे काय होणार?मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश क्षीरसागर हे महापालिका प्रशासकांना आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी करणार आहेत. त्यानंतर प्रशासक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अभिप्राय घेतील. त्यानंतर नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

या गावांचा होणार समावेश..शहराशी एकरुप झालेले पाचगाव, कळंबा, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी ही सहा पूर्ण गावे; तसेच बालिंगा व पाडळी खुर्द या दोन गावांचे मूळ गावठाण सोडून कोल्हापूर शहराला जोडलेला विस्तारित भाग यांना नवीन प्रस्तावात समावेश राहणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, तसेच त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय हद्दवाढ केली जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ग्रामीण भागातील जी भूमिका आहे तीच आमचीही आहे. त्यामुळे आमचीही मते जाणून घ्यावीत, मगच निर्णय घेतला जावा. - आमदार चंद्रदीप नरकेग्रामीण जनता आमची दुष्मन नाही; पण शहराच्या विकासाचा विचार करता हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणून ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेचा विषय न करता सामोपचाराने मार्ग काढण्यास पुढे आले पाहिजे. - आमदार राजेश क्षीरसागर