शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

स्टार ११७८..विमा कंपन्यांच्या मनमानीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी विमा योजना आणली. मात्र, त्यातील जाचक अटी आणि शेतकऱ्यांच्या आकलनशक्तीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी विमा योजना आणली. मात्र, त्यातील जाचक अटी आणि शेतकऱ्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडील सर्व गोष्टींचा त्यात समावेश केल्याने शेतकऱ्यांवर ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, कृषी विभागाने विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक लावला असून, नुकसानीनंतर ऑनलाइन तक्रारीऐवजी आता सहा पर्याय शेतकऱ्यांना खुले करून दिले असून, ते ऑफलाइनही तक्रार करू शकतात.

अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याने विमा कंपन्यांकडे ऑनलाइन माहिती भरून भरपाईची मागणी करायची होती. शेतकऱ्यांना ऑनलाइनबाबत फारशी माहिती नसल्याने अनेक वेळा चुकीची माहिती भरल्याने त्यांना लाभ होत नाही. त्यामुळे शेतकरी कंगाल आणि विमा कंपन्या मालामाल अशीच परिस्थिती दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात पाहावयास मिळते. यासाठी कृषी विभागाने त्यात बदल करून शेतकऱ्यांना सहा पर्याय दिल्याने दिलासा मिळाला आहे.

आधी काय होते पर्याय...

१) योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी घटना घडल्यानंतर ४८ तासांच्या आत नुकसानीची सूचना द्यायची. यामध्ये दिनांक, वेळ, नुकसानीची कारणे, प्रकार, प्रमाण, सर्व्हे नंबरसह विमा कंपनीकडे ऑनलाइन कळवावे लागत होते.

२) याशिवाय संबंधित बँक, कृषी किंवा महसूल विभाग अथवा टोल फ्री क्रमांकावरही माहिती देण्याची साेय होती.

हे आहेत सहा पर्याय...

१) शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.

२) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी या कार्यालयात ऑफलाइन तक्रार करू शकतात.

३) नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही नोंदविता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा अर्ज द्यावा लागणार आहे.

४) पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरदेखील तक्रार करता येणार आहे.

५) ज्या बँकांमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतसुद्धा शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येऊ शकतो.

६) टोल फ्री क्रमांकावरही माहिती देण्याची सोय.

कोट-

मुळात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता कशी येणार नाही, हेच विमा कंपन्या पाहतात. कृषी विभागाने माहिती देण्याचे पर्याय वाढविले, हे चांगले झाले. त्याचबरोबर विमा कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करावे.

- संदीप पाटील (शेतकरी, आमजाई व्हरवडे)

(महापुराने नुकसान झालेले उसाचे पीक फोटो-१५०९२०२१-कोल-शेती) (छाया- नसीर अत्तार)