शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण मंडळाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकरचा अनुभव आहे.पंचगंगा नदीच्या पात्रात इचलकरंजी ते शिरोळदरम्यान प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांच्या वर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वाढलेली जलपर्णी काढून टाकून प्रदूषण झालेच नाही, असे दाखवण्याचा उद्देश ठेवून २३ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी रासायनिक विषारी तणनाशक फवारणी ड्रोनच्या मदतीने करण्यात आली.हा नदीचा स्राेत नागरिक व जनावरे यांना पिण्यासाठी आहे. तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी, त्यावरील जलपर्णी, नदीकाठ परिसरात अनेक प्रकारचे किडे, अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी आदींचा अधिवास असून त्या परिस्थितीमध्ये अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे अस्तित्वात आहे. त्यावर विषारी तणनाशक मारले तर अनेक घटक मृत होऊन ते खाद्य म्हणून इतर कोणत्याही प्राणी- पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मृत्यू ओढवू शकतो. तसेच पाळीव जनावरे व नागरिकांनादेखील त्या विषाचा त्रास होण्याची शक्यता आहे.जलप्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा, वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा घडला असून त्याबाबत संबंधित अधिकारी व घटक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, वापरलेली साधने जप्त करावी, पाण्याचे व वनस्पतींचे नमुने संकलित करून ते फ्लाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावे. तसेच नदीकाठावर तातडीने जनावरे व नागरिकांनी पाणी वापर करू नये, मासेमारी करू नये, मासे व अन्न प्रादुर्भाव झालेल्या बाबींचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी महापालिका रडारवरदरम्यान, अशा पद्धतीने जिल्हास्तरीय समितीला विश्वासात न घेता ही फवारणी केल्यामुळे इचलकरंजी महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळ प्रदूषणमुक्तीसाठी ठोस अंमलबजावणी न करता महापालिकेने राबविलेला वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणichalkaranji-acइचलकरंजी