शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण मंडळाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकरचा अनुभव आहे.पंचगंगा नदीच्या पात्रात इचलकरंजी ते शिरोळदरम्यान प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांच्या वर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वाढलेली जलपर्णी काढून टाकून प्रदूषण झालेच नाही, असे दाखवण्याचा उद्देश ठेवून २३ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी रासायनिक विषारी तणनाशक फवारणी ड्रोनच्या मदतीने करण्यात आली.हा नदीचा स्राेत नागरिक व जनावरे यांना पिण्यासाठी आहे. तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी, त्यावरील जलपर्णी, नदीकाठ परिसरात अनेक प्रकारचे किडे, अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी आदींचा अधिवास असून त्या परिस्थितीमध्ये अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे अस्तित्वात आहे. त्यावर विषारी तणनाशक मारले तर अनेक घटक मृत होऊन ते खाद्य म्हणून इतर कोणत्याही प्राणी- पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मृत्यू ओढवू शकतो. तसेच पाळीव जनावरे व नागरिकांनादेखील त्या विषाचा त्रास होण्याची शक्यता आहे.जलप्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा, वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा घडला असून त्याबाबत संबंधित अधिकारी व घटक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, वापरलेली साधने जप्त करावी, पाण्याचे व वनस्पतींचे नमुने संकलित करून ते फ्लाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावे. तसेच नदीकाठावर तातडीने जनावरे व नागरिकांनी पाणी वापर करू नये, मासेमारी करू नये, मासे व अन्न प्रादुर्भाव झालेल्या बाबींचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी महापालिका रडारवरदरम्यान, अशा पद्धतीने जिल्हास्तरीय समितीला विश्वासात न घेता ही फवारणी केल्यामुळे इचलकरंजी महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळ प्रदूषणमुक्तीसाठी ठोस अंमलबजावणी न करता महापालिकेने राबविलेला वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणichalkaranji-acइचलकरंजी