शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:35 IST

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण मंडळाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकरचा अनुभव आहे.पंचगंगा नदीच्या पात्रात इचलकरंजी ते शिरोळदरम्यान प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांच्या वर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वाढलेली जलपर्णी काढून टाकून प्रदूषण झालेच नाही, असे दाखवण्याचा उद्देश ठेवून २३ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी रासायनिक विषारी तणनाशक फवारणी ड्रोनच्या मदतीने करण्यात आली.हा नदीचा स्राेत नागरिक व जनावरे यांना पिण्यासाठी आहे. तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी, त्यावरील जलपर्णी, नदीकाठ परिसरात अनेक प्रकारचे किडे, अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी आदींचा अधिवास असून त्या परिस्थितीमध्ये अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे अस्तित्वात आहे. त्यावर विषारी तणनाशक मारले तर अनेक घटक मृत होऊन ते खाद्य म्हणून इतर कोणत्याही प्राणी- पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मृत्यू ओढवू शकतो. तसेच पाळीव जनावरे व नागरिकांनादेखील त्या विषाचा त्रास होण्याची शक्यता आहे.जलप्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा, वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा घडला असून त्याबाबत संबंधित अधिकारी व घटक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, वापरलेली साधने जप्त करावी, पाण्याचे व वनस्पतींचे नमुने संकलित करून ते फ्लाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावे. तसेच नदीकाठावर तातडीने जनावरे व नागरिकांनी पाणी वापर करू नये, मासेमारी करू नये, मासे व अन्न प्रादुर्भाव झालेल्या बाबींचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी महापालिका रडारवरदरम्यान, अशा पद्धतीने जिल्हास्तरीय समितीला विश्वासात न घेता ही फवारणी केल्यामुळे इचलकरंजी महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळ प्रदूषणमुक्तीसाठी ठोस अंमलबजावणी न करता महापालिकेने राबविलेला वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणichalkaranji-acइचलकरंजी