शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

बारावीच्या गुणपत्रिकांसाठी महाविद्यालयांत गर्दी, प्रवेशप्रक्रियेची वाढणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:10 PM

बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे. गुणपत्रिका घेण्यासाठी मंगळवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पुढील प्रवेश प्रक्रियेची चौकशी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबारावीच्या गुणपत्रिकांसाठी महाविद्यालयांत गर्दीविद्यार्थी, पालकांकडून प्रक्रियेची चौकशी

कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने आता पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून गती मिळणार आहे. गुणपत्रिका घेण्यासाठी मंगळवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पुढील प्रवेश प्रक्रियेची चौकशी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.यावर्षी बारावीचा निकाल दि.२८ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर मंगळवारी बहुतांश महाविद्यालयांमध्ये दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले; त्यासाठी महाविद्यालयांनी प्रवेश कक्ष, ग्रंथालय, आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर काही महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रक्रिया सुरू केली; मात्र, गुणपत्रिकेची मूळ प्रत हातात नसल्याने या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद होता. गुणपत्रिकेची मूळ प्रत मंगळवारी मिळाल्यानंतर महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश अर्ज घेणे, प्रक्रियेचे वेळापत्रक, शुल्क, आदींची माहिती विद्यार्थी, पालक घेत होते.

दरम्यान, गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालयांतील पदवी प्रथम वर्षाच्या प्रक्रियेची गती वाढणार आहे. विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजमध्ये पदवी प्रथम वर्षाची प्रक्रिया आॅनलाईन राबविली जाणार आहे.

अन्य महाविद्यालयांमध्ये बुधवारपासून अर्ज वितरण सुरू होईल. गुणवत्ता यादी दि. २२ जूनपासून प्रसिद्ध होईल. त्यानंतर दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दि. २५ जूनपासून वर्ग सुरू करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे.

‘सेल्फी’ घेत आनंदविद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आले होते. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये प्रवेशाबाबतच्या गप्पा रंगल्या होत्या. मूळ गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला.

 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkolhapurकोल्हापूर